शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

आघाडी, महायुतीला बंडखोरांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:24 IST

भिवंडी लोकसभा : विश्वनाथ पाटील, बाळ्यामामांची अपक्ष उमेदवारी, वंचित बहुजन आघाडीही रिंगणात

- मुरलीधर भवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बाळ्यामामा आणि काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीचे सुरेश टावरे व महायुतीचे कपिल पाटील यांच्यापुढे या बंडखोरांचे आव्हान राहणार आहे. भिवंडी मतदारसंघात आगरी-कुणबी मतांचे विभाजन होणार असून, महायुती व आघाडीच्या विजयाची वाट हे बंडखोर अडवू शकतात. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही रिंगणात असून, कुणीच माघार न घेतल्यास भिवंडी मतदारसंघात पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.

महायुतीचे उमेदवार, विद्यमान भाजप खासदार कपिल पाटील यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित होती; मात्र शिवसेनेचे बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी शिवसेनेत असतानाच काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसचे सुरेश टावरे यांची जाहीर झालेली उमेदवारी, शेवटच्या क्षणापर्यंत ए, बी फॉर्मचा रखडलेला प्रश्न आणि बाळ्यामामाचे सुरू असलेले प्रयत्न पाहता, टावरे यांच्या उमेदवारीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम कायम होता. अखेर, टावरे यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या कार्यालयातून टावरे जवळपास १५० कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आरिफ खान, माजी पालकमंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे जावेद दळवी, खालिद गुड्डू आदी उपस्थित होते. टावरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने बाळ्यामामाचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा रंगली असतानाच, दुपारी २ वाजता ते अर्ज भरण्यासाठी हजर झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी बाळ्यामामांनी शक्तिप्रदर्शन केले नाही. त्यांच्यासोबत मोजकेच २५ कार्यकर्ते होते. टावरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्यासोबत कुणबीसेनेचे कार्यकर्ते होते. त्यांनी प्रवेशद्वाराच्या बाहेर घोषणाबाजी केली. पाटील व बाळ्यामामांची बंडखोरी महायुती व आघाडीसाठीही डोकेदुखीची ठरणार आहे.काँग्रेसने खरोखरच बनवले ‘मामा’महायुतीने कपिल पाटील यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेकडून बाळ्यामामांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्टच होते; मात्र त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना भाजपाची फूस होती, असे सांगण्यात येत असले, तरी भाजप मामांना फूस लावून आपल्याच पायावर धोंडा कशाला मारून घेईल, हा प्रश्नच आहे. मामांना काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत होती; मात्र काँग्रेसने शेवटपर्यंत झुलवून बाळ्यामामांना खरोखरच मामा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी