शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास

By अजित मांडके | Updated: March 26, 2024 15:44 IST

महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे : महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करुनही महावितरणकडे मीटर नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे महावितरणकडे मीटर नसतांना खाजगी दुकानदाराकडे मात्र मीटर असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांना खिशाला कात्री मारुन हे मीटर विकत घ्यावे लागत आहेत. परंतु जे ग्राहक थांबतात, त्यांना नवीन मीटरसाठी तब्बल ११ महिन्याहून अधिकचा कालावधी जात असल्याचे दिसत आहे.

महावितरणकडून येणाऱ्या वाढीव बिलामुळे आधीच ठाणेकर ग्राहक हैराण झाले आहेत. त्यात आता नवीन मीटरसाठी सहा सहा महिने थांबावे लागत असल्यानेही त्याचा नाहक भुर्दंड ठाण्यातील ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ठाण्यातील असंख्य ग्राहकांना  महावितरणच्या या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. काहींचे मीटर मागील काही महिन्यापासून बंद आहेत, ते मीटर बदलून मिळावे यासाठी ते वारंवार महावितरणच्या कार्यालयाचे खेटे घालत आहेत. परंतु त्यांना नवीन मीटर बसवून मिळत नाही. या उलट फॉल्टी मीटर दाखवून त्यांना सरासरी वाढीव बिल महावितरणकडून दिले जात आहे. ते कमी करण्यासाठी पुन्हा महावितरणच्या खेटा घालाव्या लागत आहेत. त्यासाठी कामाचे खाडे करावे लागत आहेत. परंतु महावितरणकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत.

त्यात एखाद्या ग्राहकाने मीटरसाठी तगादा लावलाच तर त्याला ठाण्यातील एका खाजगी दुकादाराचा पत्ता दिला जात असून त्याच्याकडून मीटर घ्या असे सांगितले जात आहे. परंतु त्याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणकडे मीटर नसतांना खाजगी दुकानदाराकडे मीटर कसे असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातही तुमच्याकडे मीटर नाही का? असे विचारल्यास वरीष्ठ पातळीवरुनच आम्हाला मीटर प्राप्त होत नसल्याचे उत्तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे.

त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना सहा महिने ते ११ महिन्यापासून नवीन मीटरच उपलब्ध होऊ शकले नसल्याची बाब दिसून आली आहे. दुसरीकडे आता नव्याने डीजीटल मीटरचे स्वप्न ग्राहकांना दाखविले जात आहे. ते मीटर आल्यावरच तुम्हाला मीटर बदलून मिळतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे महावितरणाचा कारभार, मीटरसाठी ११ महिने थांब अशीच म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेmahavitaranमहावितरण