शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महात्मा फुले हे सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते : प्रा. हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:43 IST

स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे तिसरे वर्षे होते. 

ठळक मुद्देमहात्मा फुले हे सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते : प्रा. हरी नरकेस्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला संपन्नअश्वत्थामा चिरंजीव आहे, आजही तो आहे : अशोक समेळ

ठाणेमहात्मा फुले हे केवळ एका समाजाची बांधीलकी घेऊन कार्य करणारे नेते नव्हते, सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते असा महात्मा फुले यांच्या कार्याचा आलेख सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक, महाराष्ट्र फाऊंडेशन चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते आणि व्यासंगी बहुश्रुत वक्ते प्रा. हरी नरके यांनी श्रोत्यांसमोर उलगडून उभा केला. 

साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने 'स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली होती. प्रा. हरी नरके यांचे  " कमिशनर आणि उद्योगपती महात्मा फुले." या विषयावर व्याख्यान झाले. महात्मा फुले यांचा समग्र असा कर्तृत्वाचा परिचय त्यांनी करून दिला. फुले हे  स्वतः उद्योगपती होते. मुंबईतमुंबई महानगरपालिका, मुंबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राची इमारत त्यांच्या बांधकाम कंपनीने उभारलेल्या आहेत. पुण्यात बंडगार्डन समोरचा पूल, भंडारदरा धरण त्यांच्या कंपनीने बांधलेले आहे. गणेश उत्सव फुले यांनी सुरू केला होता, पुढे लोकमान्यांनी तो मोठा केला, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. फुले यांनी केवळ शिक्षणाचे कार्य केले असे नाही. ते पुण्याच्या नगरपंचायतीचे कमिशनर ( नगरसेवक) होते. रस्ता रुंदीकरण, रस्त्यावर दिवे, बंद नळातून घरपोच पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना रास्त हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, यासारखी अनेक कामे त्यांनी त्या काळात केली. 'खरा महात्मा ' असा त्यांचा उल्लेख स्वतः महात्मा गांधीजींनी केला, यातच सारे आले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक समेळ " मी अश्वत्थामा चिरंजीव" या विषयावर व्याख्यान झाले. अश्वत्थामा चिरंजीव आहे. आजही तो आहे. कधी त्याच्या जखमेवर घालण्यासाठी तेल मागायला दारात आला तर नाही म्हणू नका.  द्रोणाचार्यांचा हा पुत्र सगळ्यात उंच आणि सर्व विद्या पारंगत होता. त्याच्या माथ्यावर रत्नमणी होता. परंतु शापाचा बळी ठरला आणि त्याच्या वाट्याला आयुष्यभराचे महाभारत जोडले गेले. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी गेला. धुळे, नंदुरबार, नर्मदा, हिमालय असा प्रवास करावा लागला. खूप परिश्रमपूर्वक हा ग्रंथ साकार केला आहे. समेळ यांनी व्याख्यानमालेत आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभिनयाच्या अभिनिवेशात सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटच्या दिवशी अॅड. संतोष भामरे,  संविधान आणि आरक्षण या विषयावर आपले मत व्यक्त केले. या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी केले. व्याख्यानमालेसाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेमुळे चांगल्या वक्त्यांची उत्तम विचार ऐकायला मिळाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई