शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले हे सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते : प्रा. हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:43 IST

स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे तिसरे वर्षे होते. 

ठळक मुद्देमहात्मा फुले हे सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते : प्रा. हरी नरकेस्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला संपन्नअश्वत्थामा चिरंजीव आहे, आजही तो आहे : अशोक समेळ

ठाणेमहात्मा फुले हे केवळ एका समाजाची बांधीलकी घेऊन कार्य करणारे नेते नव्हते, सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते असा महात्मा फुले यांच्या कार्याचा आलेख सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक, महाराष्ट्र फाऊंडेशन चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते आणि व्यासंगी बहुश्रुत वक्ते प्रा. हरी नरके यांनी श्रोत्यांसमोर उलगडून उभा केला. 

साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने 'स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली होती. प्रा. हरी नरके यांचे  " कमिशनर आणि उद्योगपती महात्मा फुले." या विषयावर व्याख्यान झाले. महात्मा फुले यांचा समग्र असा कर्तृत्वाचा परिचय त्यांनी करून दिला. फुले हे  स्वतः उद्योगपती होते. मुंबईतमुंबई महानगरपालिका, मुंबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राची इमारत त्यांच्या बांधकाम कंपनीने उभारलेल्या आहेत. पुण्यात बंडगार्डन समोरचा पूल, भंडारदरा धरण त्यांच्या कंपनीने बांधलेले आहे. गणेश उत्सव फुले यांनी सुरू केला होता, पुढे लोकमान्यांनी तो मोठा केला, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. फुले यांनी केवळ शिक्षणाचे कार्य केले असे नाही. ते पुण्याच्या नगरपंचायतीचे कमिशनर ( नगरसेवक) होते. रस्ता रुंदीकरण, रस्त्यावर दिवे, बंद नळातून घरपोच पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना रास्त हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, यासारखी अनेक कामे त्यांनी त्या काळात केली. 'खरा महात्मा ' असा त्यांचा उल्लेख स्वतः महात्मा गांधीजींनी केला, यातच सारे आले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक समेळ " मी अश्वत्थामा चिरंजीव" या विषयावर व्याख्यान झाले. अश्वत्थामा चिरंजीव आहे. आजही तो आहे. कधी त्याच्या जखमेवर घालण्यासाठी तेल मागायला दारात आला तर नाही म्हणू नका.  द्रोणाचार्यांचा हा पुत्र सगळ्यात उंच आणि सर्व विद्या पारंगत होता. त्याच्या माथ्यावर रत्नमणी होता. परंतु शापाचा बळी ठरला आणि त्याच्या वाट्याला आयुष्यभराचे महाभारत जोडले गेले. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी गेला. धुळे, नंदुरबार, नर्मदा, हिमालय असा प्रवास करावा लागला. खूप परिश्रमपूर्वक हा ग्रंथ साकार केला आहे. समेळ यांनी व्याख्यानमालेत आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभिनयाच्या अभिनिवेशात सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटच्या दिवशी अॅड. संतोष भामरे,  संविधान आणि आरक्षण या विषयावर आपले मत व्यक्त केले. या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी केले. व्याख्यानमालेसाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेमुळे चांगल्या वक्त्यांची उत्तम विचार ऐकायला मिळाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई