शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धर्म-जातीच्या आगी भडकवून पोळ्या भाजणे व खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी, नितीन बानुगडे पाटील यांची टीका

By धीरज परब | Updated: May 10, 2024 12:13 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा .  नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.

मीरारोड - सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा .  नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.

उद्धव सेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री भाईंदरच्या नवघर शाळा मैदानात जाहीरसभा झाली . यावेळी बानुगडे पाटील म्हणाले कि , चीन ने भारताचा भाग बळकावला . राज्यात  १० महिन्यात २ हजार ३६६ शेतकरी आत्महत्या झाल्या . मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली . ४५० चा गॅस सिलेंडर ११००वर तर पेट्रोल ११० वर गेले .  महागाई मुळे जनतेला जगणे मुश्किल झाले पण ह्यावर मोदी आणि भाजप बोलत नाही . भ्रष्टाचारी , बलात्कारी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत.

काळा पैसे देशात आणणार , प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार , २ कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार , महागाई रोखणार, प्रत्येकाला घर देणार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार, शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात तर बाबासाहेबांचे इंदू मिल मध्ये स्मारक उभारणार अश्या आता पर्यंतच्या दिलेल्या अनेक गॅरंटीचे काय झाले ? असा सवाल करत खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका बानुगडे पाटील यांनी केली.

खासदार विनायक राऊत म्हणाले कि , उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे नकली पुत्र म्हणून मोदींनी निर्भत्सना केली , शिवसेना तोडली याला महाराष्टाची जनता माफ करणार नाही .  काश्मिरी पंडित आजही बेघर आहेत पण स्वतःच्या मित्र उद्योगपतीला १ हजार एकर जमिन घेता यावी म्हणून कलम ३७० हटवले . जाती धर्मात भांडणे लावून एकमेकांची डोकी फोडायला लावण्याचे काम भाजपा करतेय असा आरोप राऊत यांनी केला.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले कि , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा हव्या आहेत . महिला व शेतकऱ्यांवर अत्याचार , जनतेला महागाईचा मार तर बेरोजगार ना आणखी बेरोजगार मोदी आणि भाजपने केले आहे.

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजपा आणि मोदींवर टीका केली कि , ज्यांनी इंग्रजांना साथ दिली तेच आज राज्यातील गद्दारांचे सरदार आहेत . महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी वाढवून देशातील जनतेला मूर्ख बनवले आहे .  मोदी सांगतात कि आम्ही जगातील ५ वी अर्थसत्ता सांगतात आणि दुसरीकडे ८० कोटी जनतेला दारिद्र्य रेषेखाली म्हणून मोफत धान्य देतो सांगतात . यावेळी उद्धवसेना , राष्ट्रवादी पवार गट , काँग्रेस , आम आदमी पार्टी आदी पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते . 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thane-pcठाणेmira roadमीरा रोडNitin Banugade-Patilनितीन बानुगडे-पाटीलrajan vichareराजन विचारे