शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Maharashtra Election 2019: शिवसैनिकांच्या राजीनाम्याने फरक नाही - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:33 IST

कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड हे आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी गायकवाड यांच्या विजयासाठी काम केले पाहिजे.

कल्याण : कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड हे आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी गायकवाड यांच्या विजयासाठी काम केले पाहिजे. मात्र, काही शिवसैनिक व नगरसेवकांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारात उतरण्याकरिता राजीनामे दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याविरोधात ठाकरे हेच योग्य ती कारवाई करतील, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांना गुरुवारी इशारा दिला.महायुतीच्या कल्याण पश्चिमेतील उमेदवाराच्या प्रचारार्थ कल्याण स्पोटर््स कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की, बंडखोरीचा परिणाम महायुतीवर होणार नाही.महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कल्याण पश्चिम व पूर्वेतील उमेदवारांसाठी काम केले पाहिजे. जो सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाची शिस्त व आदेश पाळतो, त्यानुसार काम करतो तोच शिवसेना व भाजपमध्ये मोठा होऊ शकतो.प्रकाश पाटील यासारखा कार्यकर्ता कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करीत आहे. त्याची दखल पक्षाकडून घेतली जाते. प्रत्येक पक्षात छोट्यामोठ्या कुरबुरी असतात. याचा अर्थ पक्षाच्या आदेशाविरोधात शिस्त धाब्यावर बसवून बंडखोरी करणे, हे योग्य नाही.नरेंद्र पवारांचा पत्ता मी कापला नाही- पाटीलकल्याण पश्चिमेची भाजपची जागा मी शिवसेनेला सोडली, असा माझ्याविषयी गैरसमज पसरवला जातो. आमदार नरेंद्र पवार यांची जागा पक्षाने शिवसेनेला सोडली, तेव्हा त्यांचा मला फोन आला. मी स्वत: याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी युतीच्या जागावाटपात तो शिवसेना दिला असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मतदारसंघ सोडण्याशी माझा काडीमात्र संबंध नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. विधानसभेसाठी कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतला. लोकसभा निवडणुकीत भिवंडीचा मतदारसंघ शिवसेनेने मागितला, तर सोडाल का, असा प्रतिप्रश्न पाटील यांना केला असता ते म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भिवंडी मतदारसंघ मागत होती. मात्र, मी सोडला नाही. मला पालकमंत्र्यावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले. काही लोकांकडून मतदारसंघ सोडण्याबाबत गैरसमज पसरवला जातो. त्यापासून कार्यकर्त्यांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :kalyan-west-acकल्याण पश्चिमkalyan-east-acकल्याण पूर्वkalyan-rural-acकल्याण ग्रामीणEknath Shindeएकनाथ शिंदे