शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 19:00 IST

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली. एमआयडीसीची जलवाहिनी फुटून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याची कबुली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारेख यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. दरम्यान एमआयडीसीची जलवाहिनी सलग दोन दिवस फुटल्याने, शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारीख यांनी दिली. सुभाष टेकडी, संभाजी चौक, भरतनगर, ओ टी सेक्शन, कुर्ला कॅम्प, गायकवाड पाडा, दहाचाळ, ज्योती कॉलनी, शहाड गावठण, आनंदनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन, महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. गेल्या शुक्रवारी जलवाहिणीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीने एक दिवस पाणी पुरवठा बंद केला. तर दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटली. तर त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. 

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीने पाणी पुरवठा विभागाची दाणादाण उडाली. अखेर सोमवारी सायंकाळ पासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने, अनेक भागात पाणी टंचाईची झळ बसली. पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी पाणी पुटवठा विभागाचा आढावा घेऊन, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीला जाब विचारला. शहरात राबविण्यात आलेली अर्धवट पाणी पुरवठा वितरण योजना, पाणी गळती, कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा आदी कारणाने शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. शहर पूर्वेतील अनेक भागात आजही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पाणी गळती थांबता थांबे ना?

शहरात ३५० कोटीच्या निधीतून पाणी वितरण योजना राबविली असूनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी गळती होऊन लाखो लिटर पाणी गटारात जात असून महापालिकेने पाणी गळती थांबविली तर लाखो लिटर पाण्याची बचत होऊन नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी