शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 19:00 IST

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली. एमआयडीसीची जलवाहिनी फुटून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याची कबुली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारेख यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. दरम्यान एमआयडीसीची जलवाहिनी सलग दोन दिवस फुटल्याने, शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारीख यांनी दिली. सुभाष टेकडी, संभाजी चौक, भरतनगर, ओ टी सेक्शन, कुर्ला कॅम्प, गायकवाड पाडा, दहाचाळ, ज्योती कॉलनी, शहाड गावठण, आनंदनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन, महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. गेल्या शुक्रवारी जलवाहिणीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीने एक दिवस पाणी पुरवठा बंद केला. तर दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटली. तर त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. 

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीने पाणी पुरवठा विभागाची दाणादाण उडाली. अखेर सोमवारी सायंकाळ पासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने, अनेक भागात पाणी टंचाईची झळ बसली. पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी पाणी पुटवठा विभागाचा आढावा घेऊन, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीला जाब विचारला. शहरात राबविण्यात आलेली अर्धवट पाणी पुरवठा वितरण योजना, पाणी गळती, कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा आदी कारणाने शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. शहर पूर्वेतील अनेक भागात आजही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पाणी गळती थांबता थांबे ना?

शहरात ३५० कोटीच्या निधीतून पाणी वितरण योजना राबविली असूनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी गळती होऊन लाखो लिटर पाणी गटारात जात असून महापालिकेने पाणी गळती थांबविली तर लाखो लिटर पाण्याची बचत होऊन नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी