शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 19:00 IST

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली. एमआयडीसीची जलवाहिनी फुटून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याची कबुली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारेख यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. दरम्यान एमआयडीसीची जलवाहिनी सलग दोन दिवस फुटल्याने, शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारीख यांनी दिली. सुभाष टेकडी, संभाजी चौक, भरतनगर, ओ टी सेक्शन, कुर्ला कॅम्प, गायकवाड पाडा, दहाचाळ, ज्योती कॉलनी, शहाड गावठण, आनंदनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन, महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. गेल्या शुक्रवारी जलवाहिणीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीने एक दिवस पाणी पुरवठा बंद केला. तर दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटली. तर त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. 

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीने पाणी पुरवठा विभागाची दाणादाण उडाली. अखेर सोमवारी सायंकाळ पासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने, अनेक भागात पाणी टंचाईची झळ बसली. पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी पाणी पुटवठा विभागाचा आढावा घेऊन, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीला जाब विचारला. शहरात राबविण्यात आलेली अर्धवट पाणी पुरवठा वितरण योजना, पाणी गळती, कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा आदी कारणाने शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. शहर पूर्वेतील अनेक भागात आजही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पाणी गळती थांबता थांबे ना?

शहरात ३५० कोटीच्या निधीतून पाणी वितरण योजना राबविली असूनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी गळती होऊन लाखो लिटर पाणी गटारात जात असून महापालिकेने पाणी गळती थांबविली तर लाखो लिटर पाण्याची बचत होऊन नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी