शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

तृतीयपंथीयाची हत्या केल्याप्रकरणी प्रियकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:08 IST

काटेमानिवली येथील घटना : शाप देणे बेतले जीवावर

कल्याण / मुंब्रा : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या धीरज उर्फ रेवा देसाई या तृतीयपंथीयाला शाप दिल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचा प्रियकर सुशील भालेराव याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आली. ‘तुझे खानदान नष्ट होईल,’ असा शाप रेवाने सुशीलला दिला होता. यात त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. याचा राग सुशीलला होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

रेवा देसाई हा १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहत होता. तो काटेमानिवली येथील शिवसह्याद्री कॉलनीतील चाळीत वास्तव्याला होता. दरम्यान मागील तीन दिवसांपासून रेवाच्या घराच्या दरवाजाला लॉक होते. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा दिसल्याने खोली मालकीणीची मुलगी भाग्यश्री हंजनकर हिने प्रथम रेवाला आवाज दिला. परंतु, कोणीही बाहेर न आल्याने तिने आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळयात रेवाचा मृतदेह चटईवर पडलेला आढळून आला. त्याच्या शरीरावर धारधार हत्याराने वार झाले होते. याची खबर तत्काळ स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, सुशीलने हत्या केल्याचा आरोप रेवाच्या नातेवाइकांनी केला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. सुशीलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती.मैत्रिणीशी झाले होते संभाषणसुशील नेहमी रेवाच्या घरी यायच्या. पण संशयावरून तो रेवाला सातत्याने मारहाण करायचा. १६ मे रोजीदेखील तो घरी आला होता आणि संशयावरून रेवाला त्याने मारहाण केली होती. ही माहिती रेवाच्या एका मैत्रिणीने त्याच्या नातेवाइकांना दिली. तिने रेवाला फोन केला होता, तेव्हा माझी तब्येत बरी नसून, सुशील हा माझेकडे आला आहे व तो संशय घेऊन मला मारहाण करीत आहे, असे त्याने मैत्रिणीला सांगितले होते.मुंब्रा पोलिसांची कारवाईहत्या करून पसार झालेल्या सुशीलला मुंब्रा पोलिसांनी शिताफीने मंगळवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर परिसरातून अटक केली. त्याचा ताबा कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आला.गुरुवारीच झाली हत्यारेवाच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. परंतु, सुशीलने रेवाची हत्या मागील गुरुवारी पहाटेच्या सुमारास केली होती. यानंतर तो घराला कुलूप लावून तो निघून गेला होता. दरम्यान रेवाचा खरोखरच मृत्यु झाला आहे का हे पाहण्यासाठी रविवारी त्याने पुन्हा त्याचे घर गाठले आणि दरवाजाला कुलूप न लावताच तेथून निघून गेला.वडिलांची कैची खुपसून हत्याडोंबिवली : खर्चाला कमी पैसे देत असल्याच्या रागातून मुलाने वडिलांवर कैचीचे वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी मुलगा अरविंद हरके यास अटक केली आहे. तर, सुभाषचंद्र (७०) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. वडील हे नातेवाइकांना खर्चाला पैसे देत होते. मात्र, आपल्याला कमी पैसे देतात, असा राग अरविंदच्या मनात होता. मंगळवारी पहाटे दोघांमध्ये या कारणावरून जोरदार भांडण झाले. संतापलेल्या अरविंदने कैचीने सुभाषचंद्र यांच्या मानेवर वार केला, तसेच डोक्यात हातोड्याने प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.