शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

तृतीयपंथीयाची हत्या केल्याप्रकरणी प्रियकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:08 IST

काटेमानिवली येथील घटना : शाप देणे बेतले जीवावर

कल्याण / मुंब्रा : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या धीरज उर्फ रेवा देसाई या तृतीयपंथीयाला शाप दिल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचा प्रियकर सुशील भालेराव याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आली. ‘तुझे खानदान नष्ट होईल,’ असा शाप रेवाने सुशीलला दिला होता. यात त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. याचा राग सुशीलला होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

रेवा देसाई हा १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहत होता. तो काटेमानिवली येथील शिवसह्याद्री कॉलनीतील चाळीत वास्तव्याला होता. दरम्यान मागील तीन दिवसांपासून रेवाच्या घराच्या दरवाजाला लॉक होते. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा दिसल्याने खोली मालकीणीची मुलगी भाग्यश्री हंजनकर हिने प्रथम रेवाला आवाज दिला. परंतु, कोणीही बाहेर न आल्याने तिने आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळयात रेवाचा मृतदेह चटईवर पडलेला आढळून आला. त्याच्या शरीरावर धारधार हत्याराने वार झाले होते. याची खबर तत्काळ स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, सुशीलने हत्या केल्याचा आरोप रेवाच्या नातेवाइकांनी केला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. सुशीलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती.मैत्रिणीशी झाले होते संभाषणसुशील नेहमी रेवाच्या घरी यायच्या. पण संशयावरून तो रेवाला सातत्याने मारहाण करायचा. १६ मे रोजीदेखील तो घरी आला होता आणि संशयावरून रेवाला त्याने मारहाण केली होती. ही माहिती रेवाच्या एका मैत्रिणीने त्याच्या नातेवाइकांना दिली. तिने रेवाला फोन केला होता, तेव्हा माझी तब्येत बरी नसून, सुशील हा माझेकडे आला आहे व तो संशय घेऊन मला मारहाण करीत आहे, असे त्याने मैत्रिणीला सांगितले होते.मुंब्रा पोलिसांची कारवाईहत्या करून पसार झालेल्या सुशीलला मुंब्रा पोलिसांनी शिताफीने मंगळवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर परिसरातून अटक केली. त्याचा ताबा कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आला.गुरुवारीच झाली हत्यारेवाच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. परंतु, सुशीलने रेवाची हत्या मागील गुरुवारी पहाटेच्या सुमारास केली होती. यानंतर तो घराला कुलूप लावून तो निघून गेला होता. दरम्यान रेवाचा खरोखरच मृत्यु झाला आहे का हे पाहण्यासाठी रविवारी त्याने पुन्हा त्याचे घर गाठले आणि दरवाजाला कुलूप न लावताच तेथून निघून गेला.वडिलांची कैची खुपसून हत्याडोंबिवली : खर्चाला कमी पैसे देत असल्याच्या रागातून मुलाने वडिलांवर कैचीचे वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी मुलगा अरविंद हरके यास अटक केली आहे. तर, सुभाषचंद्र (७०) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. वडील हे नातेवाइकांना खर्चाला पैसे देत होते. मात्र, आपल्याला कमी पैसे देतात, असा राग अरविंदच्या मनात होता. मंगळवारी पहाटे दोघांमध्ये या कारणावरून जोरदार भांडण झाले. संतापलेल्या अरविंदने कैचीने सुभाषचंद्र यांच्या मानेवर वार केला, तसेच डोक्यात हातोड्याने प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.