शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

धुराच्या लोटांनी आधारवाडी परिसर घेरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST

कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील डम्पिंगला मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. वाऱ्यामुळे पसरलेली आग बुधवारी दिवसभर ...

कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील डम्पिंगला मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. वाऱ्यामुळे पसरलेली आग बुधवारी दिवसभर धुमसतच होती. गुरूवारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, परंतु धुराचे लोट कायम राहिल्याने परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. आग डम्पिंग ग्राउंडवर खोलवर लागलेली असून त्यावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.

दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या बाजूस मंगळवारी रात्री आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. गुरुवारी आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि १२ पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग पूर्णपणे शमविण्याचे काम सुरू असून धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरले होते. सुमारे तीन ते चार एकर परिसरातील कचऱ्याला आग लागली असून ती खोलवर गेली आहे.

------------------------

लवकरच डम्पिंग बंद होणार?

गेल्या काही महिन्यांपासून केडीएमसी परिक्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षापर्यंत डम्पिंगवर ६५० टन कचरा टाकला जायचा. आता त्याचे प्रमाण आता अवघे ४० ते ४२ टनांवर आले आहे. लवकरच हे प्रमाण आणखी कमी होऊन डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आधारवाडी डम्पिंगवर कचरा जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे असे स्पष्ट केले; परंतु डम्पिंग कधी बंद होणार याबाबत त्यांनी मौन बाळगले.

------------------------