शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

वाहनतळाला आले डबक्याचे स्वरूप

By admin | Updated: July 2, 2017 05:44 IST

अंबरनाथ पालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे चव्हाण खुल्या नाट्यगृहाच्या खाली उभारण्यात येणारे वाहनतळ. सध्या

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ: अंबरनाथ पालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे चव्हाण खुल्या नाट्यगृहाच्या खाली उभारण्यात येणारे वाहनतळ. सध्या या वाहनतळात वाहने उभीकरणे शक्य होणार नाही. या वाहनतळात पाणी साचल्याने येथे वाहनांऐवजी बेडकांचे वास्तव्य वाढले आहे. साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाणही वाढले आहे.पाच वर्षांपूर्वी अंबरनाथ पालिकेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून चव्हाण नाट्यगृहाच्या जागेवर वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेतले. तळ मजल्यावर वाहनतळ व पहिल्या मजल्यावर खुले सभागृह उभारण्यात येणार होते. मात्र, या प्रकल्पाच्या मंजूर आराखड्याप्रमाणे विकास झालाच नाही. दोन वेळा त्याचा आराखडा बदलण्यात आला. त्यातच, कंत्राटदाराने संथगतीने काम केल्याने त्याचा दुहेरी फटका या प्रकल्पाला बसला. कधी प्रशासन तर कधी कंत्राटदारामुळे हे काम पाच वर्षे रखडले आहे.पाच वर्षांनंतर जुन्याच दराने काम करणे कंत्राटदाराला परवडणारे नसल्याने त्यानेही या कामात निकृष्ट बांधकाम साहित्याचा वापर करत हे काम पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. तसेच किमान वाहनतळ सुरू करण्याची इच्छा पालिकेची असल्याने ते उभारून देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, या वाहनतळाच्या जागेवर आता पाणी साचल्याने त्याचा वापर करणे शक्य होताना दिसत नाही. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात कचराही टाकण्यात आला आहे. वाहनतळातील पाणी काढून त्या ठिकाणी पार्किंग सुरू केल्यास किमान त्याचा फायदा पालिकेला होण्यास मदत होईल. सेनेची ठोस भूमिका नाही पालिका अधिकाऱ्यांना या प्रकल्पात कोणताच रस दिसत नसल्याचे समोर येत आहे. सत्ताधारी शिवसेनाही या प्रकरणात कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांनीही राजकीय पक्ष मूग गिळून असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत.