शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

‘लोकमत जलमित्र’ अभियानास पंचतारांकित हॉटेल्सचा पाठिंबा

By admin | Updated: May 11, 2016 02:06 IST

‘लोकमत’ने सुरू केलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाला आता देश पातळीवरून पाठिंबा मिळणे सुरु झाले आहे. पश्चिम भारतातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे नेतृत्त्व करणाऱ्या

मुंबई: ‘लोकमत’ने सुरू केलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाला आता देश पातळीवरून पाठिंबा मिळणे सुरु झाले आहे. पश्चिम भारतातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे नेतृत्त्व करणाऱ्या हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने (वेस्टर्न इंडिया) मंगळवारी ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीत जलमित्र अभियानास पाठिंबा देत सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या अभियानात संघटनेशी संलग्नित १ हजार ८०० पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टही जोडले जाणार आहेत.संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी या अभियानाला पाठिंबा दिला. तर अभियानाच्या सविस्तर चर्चेसाठी झालेल्या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप दातवाणी आणि उपाध्यक्ष शेरी भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘लोकमत’च्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी आखलेल्या योजनेवर सविस्तर चर्चा केली. शिवाय जलमित्र अभियानाच्या माध्यमातून ‘लोकमत’ कशाप्रकारे पाणी बचत महत्त्व पटवून देणार हे स्पष्ट केले. अधिकाधिक वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर ‘लोकमत’चा या अभियानात भर राहणार असल्यावर विस्तृत चर्चा यावेळी झाली. बैठकीअंती मुंबईसह राज्यात हे अभियान राबवण्याचा निर्णय संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप दातवाणी यांनी व्यक्त केला. शिवाय राज्यासोबतच पश्चिम भारतात येणाऱ्या इतर राज्यांतील संघटनेच्या सभासद हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्सनाही या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. तर संघटनेचे उपाध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून केवळ नफा कमाविणे हा उद्देश नाही. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही संघटना करत आहे. संघटनेचा हा उद्देश या अभियानाच्या माध्यमातून जलजागृती केल्यानंतर लोकांच्या आपोआपच लक्षात येईल. (प्रतिनिधी)> संघटना पूर्ण क्षमतेने उतरणार‘लोकमत’ने सुरू केलेल्या या अभियानास संघटनेचा पाठिंबा आहे. संघटनेने पाणी बचतीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र या अभियानाच्या माध्यमातून आता आणखी एक पाऊल पुढे जाता येणार आहे. मुळात समाजाच्या तळागाळापर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचवण्यात अभियानाची मदत होणार आहे. त्यामुळे या जलजागृतीमध्ये संघटना संपूर्ण क्षमतेने उतरणार आहे.-भरत मलकानी, अध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय> प्रत्येक थेंबाचा वापर होणारसंघटनेने पाणी बचतीसाठी प्रत्येक ग्राहकाला अर्धाग्लास पाणी देण्याचे आवाहन सर्व हॉटेल आणि रेस्टॉरन्टला केले होते. मात्र त्यानंतरही काही प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र ‘लोकमत’च्या अभियानामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होणार आहे. तरी सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टने या अभियानात सामील होऊन सामाजिक भान जपायला हवे.- दिलीप दातवाणी, वरिष्ठ उपाध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय> लाखो लीटर पाणी वाचवूपंचतारांकित हॉटेल्समधील फ्लश आणि वॉश बेसिनमधील नळाचा प्रेशर कमी करून पाणी बचतीसाठी संघटनेने प्रयत्न सुरू केले. शिवाय अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, गरज नसल्यास एकच टॉवेल पर्यटकांनी दोन दिवस वापरावा, असे आवाहन करणारे पोस्टर्स संघटनेने बहुतेक हॉटेलमध्ये आणि रूम्समध्ये लावलेले आहेत. त्यात आत्ता ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानामुळे आणखी जलजागृती करता येणार आहे. परिणामी आणखी लाखो लीटर पाणी वाचवण्यात संघटनेला यश येईल, अशी खात्री आहे. - शेरी भाटिया, उपाध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय