शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत जलमित्र’ अभियानास पंचतारांकित हॉटेल्सचा पाठिंबा

By admin | Updated: May 11, 2016 02:06 IST

‘लोकमत’ने सुरू केलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाला आता देश पातळीवरून पाठिंबा मिळणे सुरु झाले आहे. पश्चिम भारतातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे नेतृत्त्व करणाऱ्या

मुंबई: ‘लोकमत’ने सुरू केलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाला आता देश पातळीवरून पाठिंबा मिळणे सुरु झाले आहे. पश्चिम भारतातील पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टचे नेतृत्त्व करणाऱ्या हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने (वेस्टर्न इंडिया) मंगळवारी ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीत जलमित्र अभियानास पाठिंबा देत सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या अभियानात संघटनेशी संलग्नित १ हजार ८०० पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टही जोडले जाणार आहेत.संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी या अभियानाला पाठिंबा दिला. तर अभियानाच्या सविस्तर चर्चेसाठी झालेल्या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप दातवाणी आणि उपाध्यक्ष शेरी भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘लोकमत’च्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी आखलेल्या योजनेवर सविस्तर चर्चा केली. शिवाय जलमित्र अभियानाच्या माध्यमातून ‘लोकमत’ कशाप्रकारे पाणी बचत महत्त्व पटवून देणार हे स्पष्ट केले. अधिकाधिक वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर ‘लोकमत’चा या अभियानात भर राहणार असल्यावर विस्तृत चर्चा यावेळी झाली. बैठकीअंती मुंबईसह राज्यात हे अभियान राबवण्याचा निर्णय संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप दातवाणी यांनी व्यक्त केला. शिवाय राज्यासोबतच पश्चिम भारतात येणाऱ्या इतर राज्यांतील संघटनेच्या सभासद हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्सनाही या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. तर संघटनेचे उपाध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून केवळ नफा कमाविणे हा उद्देश नाही. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही संघटना करत आहे. संघटनेचा हा उद्देश या अभियानाच्या माध्यमातून जलजागृती केल्यानंतर लोकांच्या आपोआपच लक्षात येईल. (प्रतिनिधी)> संघटना पूर्ण क्षमतेने उतरणार‘लोकमत’ने सुरू केलेल्या या अभियानास संघटनेचा पाठिंबा आहे. संघटनेने पाणी बचतीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र या अभियानाच्या माध्यमातून आता आणखी एक पाऊल पुढे जाता येणार आहे. मुळात समाजाच्या तळागाळापर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचवण्यात अभियानाची मदत होणार आहे. त्यामुळे या जलजागृतीमध्ये संघटना संपूर्ण क्षमतेने उतरणार आहे.-भरत मलकानी, अध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय> प्रत्येक थेंबाचा वापर होणारसंघटनेने पाणी बचतीसाठी प्रत्येक ग्राहकाला अर्धाग्लास पाणी देण्याचे आवाहन सर्व हॉटेल आणि रेस्टॉरन्टला केले होते. मात्र त्यानंतरही काही प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र ‘लोकमत’च्या अभियानामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होणार आहे. तरी सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टने या अभियानात सामील होऊन सामाजिक भान जपायला हवे.- दिलीप दातवाणी, वरिष्ठ उपाध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय> लाखो लीटर पाणी वाचवूपंचतारांकित हॉटेल्समधील फ्लश आणि वॉश बेसिनमधील नळाचा प्रेशर कमी करून पाणी बचतीसाठी संघटनेने प्रयत्न सुरू केले. शिवाय अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, गरज नसल्यास एकच टॉवेल पर्यटकांनी दोन दिवस वापरावा, असे आवाहन करणारे पोस्टर्स संघटनेने बहुतेक हॉटेलमध्ये आणि रूम्समध्ये लावलेले आहेत. त्यात आत्ता ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानामुळे आणखी जलजागृती करता येणार आहे. परिणामी आणखी लाखो लीटर पाणी वाचवण्यात संघटनेला यश येईल, अशी खात्री आहे. - शेरी भाटिया, उपाध्यक्ष, एचआरडब्ल्यूआय