शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

प्रस्थापितांना शह देण्यासाठी ठाण्यात ‘लोक उमेदवार’

By admin | Updated: January 11, 2017 07:22 IST

ठाणे महागनगर पालिकेत मतदारांवर लादली जाणारी राजकीय पुढाऱ्यांची घराणेशाही, टक्केवारीच्या भ्रष्टाचारात अडकलेली व्यवस्था आणि शहराचा झालेला इस्कोट

ठाणे : ठाणे महागनगर पालिकेत मतदारांवर लादली जाणारी राजकीय पुढाऱ्यांची घराणेशाही, टक्केवारीच्या भ्रष्टाचारात अडकलेली व्यवस्था आणि शहराचा झालेला इस्कोट अशा विविध समस्यांवर आता ठाणेकर मतदारांना उतारा मिळणार आहे. ठाण्यातील भ्रष्ट राजकीय आणि शासकीय व्यवस्थेशी लढा देणारे काही दक्ष नागरिक एकत्र आले आहेत. विविध संघटना आणि पक्षांमधील या नागरिकांनी एका छताखाली येऊन ठाणे मतदाता जागरण अभियान तयार केले असून या अभियानातून लोकांमधून लोकांनी सुचवलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहे. येथील गडकरी रंगायतनच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ठाणे महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. याच धर्तीवर आता ठाण्यातील काही संघटनाही एकत्र येताना दिसत आहेत. अशा संघटनानी एकत्र येऊन या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांमध्ये जाऊन या संघटना मतदानाबद्दल जनजागृती करणार आहेत. त्याचसोबत सर्व प्रभागांमध्ये जाऊन थेट लोकांमधूनच उमेदवार निवडणार आहेत. त्यानंतर लोकांनी सुचिवलेल्या या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांचा हे जनजागर अभियानाचे कार्यकर्ते प्रचार आणि त्याचे काम करणार आहे. किमान ५० उमेदवार या माध्यमातून उभे राहतील अशी माहिती या अभियानाचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांनी दिली. ठाण्यातील बिघडलेली घडी पत्रकार, वकील, डॉक्टर, साहित्यिक आणि इतर क्षेत्रातील जाणकार व्यक्तींमार्फत लोकांसमोर मांडून त्यांनीच सुचिवलेल्या या उमेदवारांचा प्रचार केला जाणार आहे. ठाणेकर मतदारांनी त्यांचे उमेदवार सुचवावेत, आम्ही त्यांचा प्रचार करू असे अध्यक्ष आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी सुनील कर्णिक, संजीव साने, वंदना शिंदे, वकील राजय गायकवाड, उन्मेष बागवे, निशिकांत दासूद, जगदीश खैरालिया, डॉ. मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)