शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

एनआरसी कंपनीच्या जागेवर उभे राहणार लॉजिस्टिक पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक ...

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार असल्याची माहिती अदानी कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली. कामगार संघटनांचा थकीत देण्यांचा अडीच हजार रुपयांचा दावाही कंपनीने फेटाळून लावला असून, कामगारांच्या देण्यापोटी १०४ कोटी राष्ट्रीय लवादाकडे भरल्याचे सांगितले.

एनआरसी कंपनीच्या जुन्या व्यवस्थापनाने ४४० एकर जागेपैकी १०३ एकर जागा रहेजा बिल्डरला विकली होती. हा विक्री व्यवहार न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर कंपनी लिलावात विकण्यास काढली असता अदानी यांच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली. जुन्या व्यवस्थापनासोबत रहेजांचा व्यवहार झाला हाेता. आता अदानी रहेजा यांच्यासोबत सेटलमेंट करून त्याची माहिती न्यायालयात देणार असे ठरले आहे. अदानीने कंपनीची जागा लिलावात घेतल्याने त्यांना जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनी कायद्यानुसार, राष्ट्रीय लवादाच्या आदेशानुसार कामगारांची देणी देण्यासाठी ३२ कोटी रुपये भरण्याची तयारी अदानी कंपनीने दाखविली आहे. मात्र, इतक्या रकमेत कामगारांची देणी भागणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाल्याने अदानीने कामगारांच्या देण्यापोटी लवादाकडे १०४ कोटी रुपये भरले आहेत. ही रक्कम भरल्यापासून ४५ दिवसांत धनादेशाद्वारे कामगारांना वाटप करण्याचा आदेश दिलेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाच हजार कामगारांपैकी ६५० कामगारांनी धनादेश स्वीकारले आहेत. जवळपास १४ कोटी ५० लाख रुपये कामगारांना वितरित केले आहेत. ज्या वर्षी कंपनी बंद झाली, त्या वर्षाचा पगार थकबाकी म्हणून दिला जातो. कंपनी १० वर्षे बंद असल्याने बंद काळातील पगार थकबाकीच्या स्वरूपात दिला जाऊ शकत नाही. कारण त्या काळात उत्पादन बंद होते, असे अदानी कंपनीचे म्हणणे असून, त्यामुळे १०४ कोटींची रक्कम कामगारांची देणी देण्यासाठी पुरेशी आहे, असा अदानी कंपनीचा दावा आहे. कामगार संघटनांच्या दाव्यानुसार अडीच हजार कोटी रुपयांची थकीत देणी देण्याचा विचार व्यवहार्य नाही, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

जुन्या जीर्ण झालेल्या कामगार वसाहतीमधील घरे तोडण्यास लवादाकडून स्थगिती आदेश नसल्याने सध्या सुरू केलेली पाडकाम कारवाई कामगार विरोधी नसल्याचे अदानी यांचे म्हणणे आहे. एनआरसी कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. बँकांचे कर्ज, कामगार आणि कर्मचाऱ्यांची देणी, केडीएमसीचा थकलेला मालमत्ता कर, आदी मिळून जवळपास ३०० कोटी रुपयांची देणी अदानी कंपनी चुकती करणार आहे.

फोटो-कल्याण-एनआरसी

-----------------------