शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

एनआरसी कंपनीच्या जागेवर उभे राहणार लॉजिस्टिक पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक ...

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार असल्याची माहिती अदानी कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली. कामगार संघटनांचा थकीत देण्यांचा अडीच हजार रुपयांचा दावाही कंपनीने फेटाळून लावला असून, कामगारांच्या देण्यापोटी १०४ कोटी राष्ट्रीय लवादाकडे भरल्याचे सांगितले.

एनआरसी कंपनीच्या जुन्या व्यवस्थापनाने ४४० एकर जागेपैकी १०३ एकर जागा रहेजा बिल्डरला विकली होती. हा विक्री व्यवहार न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर कंपनी लिलावात विकण्यास काढली असता अदानी यांच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली. जुन्या व्यवस्थापनासोबत रहेजांचा व्यवहार झाला हाेता. आता अदानी रहेजा यांच्यासोबत सेटलमेंट करून त्याची माहिती न्यायालयात देणार असे ठरले आहे. अदानीने कंपनीची जागा लिलावात घेतल्याने त्यांना जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनी कायद्यानुसार, राष्ट्रीय लवादाच्या आदेशानुसार कामगारांची देणी देण्यासाठी ३२ कोटी रुपये भरण्याची तयारी अदानी कंपनीने दाखविली आहे. मात्र, इतक्या रकमेत कामगारांची देणी भागणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाल्याने अदानीने कामगारांच्या देण्यापोटी लवादाकडे १०४ कोटी रुपये भरले आहेत. ही रक्कम भरल्यापासून ४५ दिवसांत धनादेशाद्वारे कामगारांना वाटप करण्याचा आदेश दिलेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाच हजार कामगारांपैकी ६५० कामगारांनी धनादेश स्वीकारले आहेत. जवळपास १४ कोटी ५० लाख रुपये कामगारांना वितरित केले आहेत. ज्या वर्षी कंपनी बंद झाली, त्या वर्षाचा पगार थकबाकी म्हणून दिला जातो. कंपनी १० वर्षे बंद असल्याने बंद काळातील पगार थकबाकीच्या स्वरूपात दिला जाऊ शकत नाही. कारण त्या काळात उत्पादन बंद होते, असे अदानी कंपनीचे म्हणणे असून, त्यामुळे १०४ कोटींची रक्कम कामगारांची देणी देण्यासाठी पुरेशी आहे, असा अदानी कंपनीचा दावा आहे. कामगार संघटनांच्या दाव्यानुसार अडीच हजार कोटी रुपयांची थकीत देणी देण्याचा विचार व्यवहार्य नाही, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

जुन्या जीर्ण झालेल्या कामगार वसाहतीमधील घरे तोडण्यास लवादाकडून स्थगिती आदेश नसल्याने सध्या सुरू केलेली पाडकाम कारवाई कामगार विरोधी नसल्याचे अदानी यांचे म्हणणे आहे. एनआरसी कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. बँकांचे कर्ज, कामगार आणि कर्मचाऱ्यांची देणी, केडीएमसीचा थकलेला मालमत्ता कर, आदी मिळून जवळपास ३०० कोटी रुपयांची देणी अदानी कंपनी चुकती करणार आहे.

फोटो-कल्याण-एनआरसी

-----------------------