शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन घ्यायला जाते. सामान्यांची अर्थव्यवस्था कोणी बघायची? सरकारी फतवा काढून थोडेच पोट भरते. आता वर्ष झाले हाताला काम नाही. त्यामुळे लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो. कोणाकडे दाद मागायची? कोणीच मदतीला येत नाही. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन, बाहेर पडायचे नाही हे चालणार नाही. आम्हाला संसार आहे. त्यामुळे ताे चालविण्यासाठी कामधंदा हवाच, असे मत शहरातील घरकाम करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.

गतवर्षी न भूतो असा लॉकडाऊन अगदी मार्चपासून नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालला. त्यानंतर अनलॉकचे नियम असे काहीना काही सुरूच आहे, त्यातून मार्ग निघत नाही ताेच लगेच आता पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी सुरू झाली हे योग्य नाही, असे मत महिलांनी व्यक्त केले.

सरकार धान्य देण्याचे म्हणते, पण ते मिळविताना किती अडचणी येतात. अनेकांना मिळत नाही, ज्यांना मिळते ते समाधानी नाहीत. सांगा कसे दिवस काढायचे? महागाई वाढत चालली, मुले शाळा नसल्याने शिक्षणाविना मोठी होत आहेत, त्यासोबत त्यांच्या अपेक्षा वाढत असतात. आईवडिलांकडे नाही तर कोणाकडे ते मागणार? सरकार थोडेच येते गरजा भागवायला. त्यामुळे यापुढे कोरोना असो नसो. लॉकडाऊन नको, असा पवित्रा महिलांनी व्यक्त केला.

* शहरात बहुतांशी इमारतींच्या ठिकाणी घरातील धुणी-भांडी, लादी-पोछा करण्यासाठी प्रति कामाचे ५०० ते ७०० रुपये घेतले जातात, साधारणपणे ५ घरांचे काम काही महिला करतात. असे करून महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावतात. पण, त्यांची ही कमाई वर्ष झाले बंद झाली आहे. त्यात लॉकडाऊन म्हटले की समस्यांत वाढ होणार असल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

-----------

प्रतिक्रिया

* लॉकडाऊन नको, हाताला काम द्या. वर्ष, दीड वर्ष झाले उत्पन्न बंद झाले. मुलाबाळांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण कशा करायच्या? सरकार काही देत नाही, एक-दोन वेळा अन्नधान्य दिले म्हणजे प्रश्न सुटले असे होत नसते.

- संजना पांचाळ

* मला लॉकडाऊनआधी सुमारे २० हजार रुपये पगारवाली नोकरी होती. पण, आता ते काम मिळत नाही. कामाला लावायचे म्हटले तरी काही जण पैसे मागतात. ते कुठून द्यायचे? कसे बसे दिल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागले आणि नोकरी सुटली तर काय करायचे? खूप तणाव येतो. बस झाले लॉकडाऊन वगैरे. उपाययोजना करा आणि यातून सोडवा.

- सुप्रिया पाटील

* सुरुवातीला लॉकडाऊनचे काही वाटले नाही, पण आता दडपण येते. घरात मुली, नवरा आहे. मुले माेठी होत आहेत. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आहे. पण, तरीही अपेक्षा असतातच ना? हाताला काम मिळायला हवे. वर्ष झाले. आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे? सरकार थोडी येणार आहे त्यासाठी.

- वंदना जोशीकर

-------