शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन... पण, २२ जोडप्यांनी साधला अक्षयतृतीयेचा मुहूर्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:38 IST

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायला ...

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायला वेळ पाहावी लागत नाही. या दिवशी अनेक लग्नसोहळे आयोजिले जातात. मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर विवाहसोहळे आयोजित करता आले नाहीत. यंदाही लॉकडाऊन लक्षात घेत काहींना विवाहसोहळे रद्द करावे लागले खरे; पण दुसरीकडे हाच मुहूर्त साधत ठाण्यात २२ जाेडप्यांनी रजिस्टर्ड पद्धतीने आपले छोटेखानी विवाहसोहळे पार पाडले.

कोरोनामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असल्याने अनेकांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आयोजिलेले लग्नसोहळे आधीच रद्द केले. ठाण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने कमी होत असले तरी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत. तरी गेल्या वर्षापासून रखडलेले विवाहसोहळे यंदा अक्षयतृतीयेला उरकायचे असे अनेकांनी ठरवले होते. मात्र यंदाही एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक विवाह इच्छुकांचा हिरमोड झाला. तसेच त्यांच्या कुटुंबाने केलेल्या नियोजनावरही पाणी फिरले. मात्र, ठाण्यातील २२ जोडप्यांनी अक्षयतृतीयेला नोंदणी विवाह करून ‘मुहूर्त’ साधला.

------------

दरवर्षी या काळात अनेक विवाह होतात. मात्र यंदा एप्रिलपासून लॉकडाऊन असल्याने दररोज ५-६ च विवाह होत आहेत. मात्र शुक्रवारी अक्षयतृतीयेमुळे २२ जोडप्यांचे शुभमंगल झाले, अशी माहिती विवाह नोंदणी अधिकारी ए.एस. यादव यांनी दिली.

-------------------

आम्ही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विवाह करणार होतो. मात्र लॉकडाऊनमुळे तो बेत रद्द केला. दिवाळीनंतरच्या काळात घरातील काही जण कोरोनाबाधित झाल्याने सोहळा अक्षयतृतीयेला करण्याचे ठरविले होते. मात्र पुन्हा लॉकडाऊन आणि निर्बंध लागले. त्यामुळे मग नोंदणी पद्धतीने विवाह करायचे ठरवून तारीख नोंदवली आणि आज मुहूर्त साधल्याचे एका जोडप्याने सांगितले.

-------------

नियमांचा अडसर

आम्ही अक्षयतृतीयेचा मुहूर्त पाहून मुलीच्या लग्नासाठी हॉल आणि इतर सर्व तयारी केली होती. पण, लॉकडाऊन आणि निर्बंध पाहता इतक्या कमी माणसांत कसे लग्न उरकायचे, हा प्रश्न आहे. तसेच इतर खरेदीसाठी दुकानेही सुरू नसल्याने आम्ही सोहळाच रद्द केला.

- रमेश पळके, वधूपिता

-----------

मंगलकार्यालयांचे गणित बिघडले

शहरात हजारो मंगलकार्यालये असून आमचे नुकसान होत आहे, असे मत हे मंगलकार्यालय चालक व्यक्त करीत आहेत.

आम्हाला जागेचे भाडे भरावेच लागते. पुन्हा त्याची साफसफाई, त्याचे लाईटबिल भरावे लागते आहे. गेल्या अनेक महिन्यांत विवाहसोहळे झालेच नाहीत. झाले तरी ते अतिशय कमी बजेटचे असतात. त्यातून कोणताही नफा न होता उलट तोटाच होत आहे.

आमचे पडदे, टेबल, खुर्च्या असे अनेक साहित्य खराब होत असल्याचेही मंगल कार्यालय चालक सांगतात.