शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ठिकठिकाणची वीज गुल : पाणीपुरवठ्यावरही परिमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसराला तौउते वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. याशिवाय ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला ...

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसराला तौउते वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली. याशिवाय ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी काही भागात मंगळवारी सायंकाळपर्यंत अंधारच होता. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाल्याने लोकांची गैरसोय झाली.

वादळी वाऱ्यामुळे गायकरपाड्यातील वीज सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झाली होती. येथील नागरिकांना मंगळवारी दुपारी पाच वाजेपर्यंत खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागल्याचे या भागातील सुशीला गीते यांनी सांगितले. त्याचबरोबर आंबेडकर रोड आणि वलीपीर रोडवरील वीजपुरवठा सोमवारी चार तासांकरिता खंडित झाला होता. मंगळवारी पुन्हा चार तास वीजपुरवठा खंडित होता. आंबेडकर रोडवरील वीज वाहिनीवरून महापालिकेच्या मुख्यालयातील पालिका भवनास वीजपुरवठा केला जातो. महापालिका भवनाच्या इमारतीत सकाळी चार वाजता वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर अद्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे महापालिका भवनातील वीजपुरवठा जनरेटरवर सुरू होता.

यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधिकारी म्हणाले की, आमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नशील आहेत. आमचा एकही कामगार वीजपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय घरी जाणार नाही.

सोमवारपासून वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठा वितरणावर त्याचा परिमाण झाला. सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली आहे. बुधवारी पाणी कपातीच्या शेड्यूलनुसार शटडाऊन घेण्यात येणार आहे.

----------------------