शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सूर्याच्या पाण्यासाठी स्थानिक एकवटले

By admin | Updated: May 3, 2017 05:13 IST

सूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर

हितेन नाईक/ निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरेसूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला असून ४ मे रोजी मासवण येथे निषेधाची सभाही आयोजिली आहे.नदी तीरावरील पालघर-डहाणू-विक्र्रमगड तालुक्यातील असंख्य गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. धरणाचे बहुतांश पाणी वसई-विरार व अन्य प्रकल्पक्षेत्राबाहेरील ठिकाणी वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांना पुढे सिंचनासाठीच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होणार नाही. सूर्याचे पाणी इतरत्र वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर ४ मे रोजी सूर्या नदी तीरावरील मासवण येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत तिन्ही तालुक्यातील शेतकरी व आदिवासी एकत्र जमून पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. धामणी व कवडास धरणांचा सूर्य प्रकल्प हा पालघर-डहाणू-विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी प्रामुख्याने उभारण्यात आला असून या प्रकल्पाअंतर्गत १४६८६ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. १९७८ ते १९८० दरम्यान उभारण्यात आलेल्या या दोन्ही धरणातील पाणी साठा २९९.०१ दलघमी इतका आहे. या प्रकल्पाचे पाणी बिगरसिंचनासाठी पालघर व डहाणू या तालुक्याकरिता वापरण्यात येते आज या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी ४० दलघमी इतके पाणी देण्यात आलेले आहे. याउलट प्रकल्प क्षेत्राबाहेर वसई-विरार, मीरा-भाईदर व मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता आजवर १८० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. सिंचनासाठीच्या या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर हे पाणी या ठिकाणी वळविल्यामुळे १४६८६ हेक्टर सिंचन उद्दिष्टयापैकी ७०८१ हेक्टर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे. याचा मोठा फटका आदिवासी व शेतकरी बांधवाना बसणार आहे. परिणामी दुबार पिके घेणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन जाऊन त्यांना बेरोजगारी व पुढे कुपोषणाच्या गर्तेत ढकलले जाणार आहे.