शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सूर्याच्या पाण्यासाठी स्थानिक एकवटले

By admin | Updated: May 3, 2017 05:13 IST

सूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर

हितेन नाईक/ निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरेसूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला असून ४ मे रोजी मासवण येथे निषेधाची सभाही आयोजिली आहे.नदी तीरावरील पालघर-डहाणू-विक्र्रमगड तालुक्यातील असंख्य गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. धरणाचे बहुतांश पाणी वसई-विरार व अन्य प्रकल्पक्षेत्राबाहेरील ठिकाणी वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांना पुढे सिंचनासाठीच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होणार नाही. सूर्याचे पाणी इतरत्र वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर ४ मे रोजी सूर्या नदी तीरावरील मासवण येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत तिन्ही तालुक्यातील शेतकरी व आदिवासी एकत्र जमून पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. धामणी व कवडास धरणांचा सूर्य प्रकल्प हा पालघर-डहाणू-विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी प्रामुख्याने उभारण्यात आला असून या प्रकल्पाअंतर्गत १४६८६ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. १९७८ ते १९८० दरम्यान उभारण्यात आलेल्या या दोन्ही धरणातील पाणी साठा २९९.०१ दलघमी इतका आहे. या प्रकल्पाचे पाणी बिगरसिंचनासाठी पालघर व डहाणू या तालुक्याकरिता वापरण्यात येते आज या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी ४० दलघमी इतके पाणी देण्यात आलेले आहे. याउलट प्रकल्प क्षेत्राबाहेर वसई-विरार, मीरा-भाईदर व मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता आजवर १८० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. सिंचनासाठीच्या या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर हे पाणी या ठिकाणी वळविल्यामुळे १४६८६ हेक्टर सिंचन उद्दिष्टयापैकी ७०८१ हेक्टर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे. याचा मोठा फटका आदिवासी व शेतकरी बांधवाना बसणार आहे. परिणामी दुबार पिके घेणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन जाऊन त्यांना बेरोजगारी व पुढे कुपोषणाच्या गर्तेत ढकलले जाणार आहे.