शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

सूर्याच्या पाण्यासाठी स्थानिक एकवटले

By admin | Updated: May 3, 2017 05:13 IST

सूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर

हितेन नाईक/ निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरेसूर्या नदीचे पाणी वसई-विरार, मीरा-भाईंदर व अन्य महानगरासाठी वळविण्यास जिल्ह्यातील तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला असून ४ मे रोजी मासवण येथे निषेधाची सभाही आयोजिली आहे.नदी तीरावरील पालघर-डहाणू-विक्र्रमगड तालुक्यातील असंख्य गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. धरणाचे बहुतांश पाणी वसई-विरार व अन्य प्रकल्पक्षेत्राबाहेरील ठिकाणी वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांना पुढे सिंचनासाठीच नव्हे तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होणार नाही. सूर्याचे पाणी इतरत्र वळविल्यामुळे प्रकल्पक्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर ४ मे रोजी सूर्या नदी तीरावरील मासवण येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत तिन्ही तालुक्यातील शेतकरी व आदिवासी एकत्र जमून पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. धामणी व कवडास धरणांचा सूर्य प्रकल्प हा पालघर-डहाणू-विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी प्रामुख्याने उभारण्यात आला असून या प्रकल्पाअंतर्गत १४६८६ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. १९७८ ते १९८० दरम्यान उभारण्यात आलेल्या या दोन्ही धरणातील पाणी साठा २९९.०१ दलघमी इतका आहे. या प्रकल्पाचे पाणी बिगरसिंचनासाठी पालघर व डहाणू या तालुक्याकरिता वापरण्यात येते आज या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी ४० दलघमी इतके पाणी देण्यात आलेले आहे. याउलट प्रकल्प क्षेत्राबाहेर वसई-विरार, मीरा-भाईदर व मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता आजवर १८० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. सिंचनासाठीच्या या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर हे पाणी या ठिकाणी वळविल्यामुळे १४६८६ हेक्टर सिंचन उद्दिष्टयापैकी ७०८१ हेक्टर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे. याचा मोठा फटका आदिवासी व शेतकरी बांधवाना बसणार आहे. परिणामी दुबार पिके घेणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन जाऊन त्यांना बेरोजगारी व पुढे कुपोषणाच्या गर्तेत ढकलले जाणार आहे.