शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:26 IST

मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे.

- अजित मांडकेठाणे : मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा करणे शक्य नसल्याने अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. ज्या भागात वीज देयकांची वसुली कमी आहे, त्या भागांमध्येही भारनियमन सुरू आहे.राज्यात अनेक ठिकाणी महावितरणच्या वतीने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हीट आणि ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने सुरू केलेल्या अघोषित भारनियमानुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा या भागात सध्या ६ ते ७ तासांचे अघोषित भारनियन सुरु आहे. कल्याण, डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आदीसह इतर ग्रामीण भागात सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात भारनियमन सुरू आहे.आॅक्टोबर हीटमुळे अचानक विजेची मागणी वाढली आहे. त्यात परतीच्या पावसानेसुद्धा हजेरी न लावण्याने शेतकऱ्यांनी पंप सुरु करुन पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावतसध्या राज्यात विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॅट एवढी असून विजेची उपलब्धता सुमारे १६००० ते १७००० मेगावॅट आहे. त्यामुळे दोन हजार ते २ हजार ५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने भारनियमन सुरू करावे लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.भारनियमनातून शहरी भाग वगळण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत आहे; परंतु वसुली कमी होत आहे, अशा भागात सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला गेला, तर भारनियमन बंद होईल, असा दावा महावितरणने केला.

टॅग्स :thaneठाणे