शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:26 IST

मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे.

- अजित मांडकेठाणे : मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा करणे शक्य नसल्याने अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. ज्या भागात वीज देयकांची वसुली कमी आहे, त्या भागांमध्येही भारनियमन सुरू आहे.राज्यात अनेक ठिकाणी महावितरणच्या वतीने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हीट आणि ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने सुरू केलेल्या अघोषित भारनियमानुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा या भागात सध्या ६ ते ७ तासांचे अघोषित भारनियन सुरु आहे. कल्याण, डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आदीसह इतर ग्रामीण भागात सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात भारनियमन सुरू आहे.आॅक्टोबर हीटमुळे अचानक विजेची मागणी वाढली आहे. त्यात परतीच्या पावसानेसुद्धा हजेरी न लावण्याने शेतकऱ्यांनी पंप सुरु करुन पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावतसध्या राज्यात विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॅट एवढी असून विजेची उपलब्धता सुमारे १६००० ते १७००० मेगावॅट आहे. त्यामुळे दोन हजार ते २ हजार ५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने भारनियमन सुरू करावे लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.भारनियमनातून शहरी भाग वगळण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत आहे; परंतु वसुली कमी होत आहे, अशा भागात सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला गेला, तर भारनियमन बंद होईल, असा दावा महावितरणने केला.

टॅग्स :thaneठाणे