शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:26 IST

मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे.

- अजित मांडकेठाणे : मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा करणे शक्य नसल्याने अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. ज्या भागात वीज देयकांची वसुली कमी आहे, त्या भागांमध्येही भारनियमन सुरू आहे.राज्यात अनेक ठिकाणी महावितरणच्या वतीने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हीट आणि ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने सुरू केलेल्या अघोषित भारनियमानुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा या भागात सध्या ६ ते ७ तासांचे अघोषित भारनियन सुरु आहे. कल्याण, डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आदीसह इतर ग्रामीण भागात सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात भारनियमन सुरू आहे.आॅक्टोबर हीटमुळे अचानक विजेची मागणी वाढली आहे. त्यात परतीच्या पावसानेसुद्धा हजेरी न लावण्याने शेतकऱ्यांनी पंप सुरु करुन पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे.मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावतसध्या राज्यात विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॅट एवढी असून विजेची उपलब्धता सुमारे १६००० ते १७००० मेगावॅट आहे. त्यामुळे दोन हजार ते २ हजार ५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे.विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने भारनियमन सुरू करावे लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.भारनियमनातून शहरी भाग वगळण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत आहे; परंतु वसुली कमी होत आहे, अशा भागात सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला गेला, तर भारनियमन बंद होईल, असा दावा महावितरणने केला.

टॅग्स :thaneठाणे