शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

उल्हासनगरात विजेचा लपंडाव, आमदार आयलानी यांनी घेतली बैठक

By सदानंद नाईक | Updated: June 28, 2023 18:19 IST

उल्हासनगर : शहरातील विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिकांसह व्यापारी हैराण झाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन ...

उल्हासनगर : शहरातील विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिकांसह व्यापारी हैराण झाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन महावितरण अधिकाऱ्याची बैठक घेऊन विजेच्या लपंडाव बाबत धारेवर धरले.

 उल्हासनगरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले असून पावसाळ्यात काही अनुचित घटना होऊ नये म्हणून सुरक्षितेचे कारण सांगून वीज पुरवठा बंद केला जात असल्याची माहिती महावितरण विभागाचे अधिकारी देतात. तर अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट तसेच झाडे पडून वीज पुरवठा बंद होत असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही उघडे रोहित्र, जुन्या झालेल्या विधुत वाहिन्या, दुरुस्ती न केलेले विजेचे खांब आदी कारणाने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन बुधवारी दुपारी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्येज कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना आमदार कार्यालयात बोलावून चर्चा केली. संततधार पावसाने वीज पुरवठा खंडित होत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिल्यावर वीज पुरवठा काही दिवसात सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार आयलानी यांच्या कार्यालयातील बैठकीला महावितरण विभागाचे अभियंता कुलकर्णी यांच्यासह विभागीय शाखा अभियंते, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश।सुखरामनी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज