शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आदिवासी पाड्यांत पडणार उजेड; सोलर दिवे लावले जाणार

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 14:22 IST

पथदिवे नसल्याने सायंकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुले व जेष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत.

ठाणे :  घोडबंदर भागात असलेल्या जवळपास २७ छोटे-मोठे आदिवासी पाड्यात आता रस्त्यांवर पथदिवे लावले जाणार आहेत. यासाठी पाच कोटींचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे आता आदीवासी पाड्यातून जाणाºया नागरिकांना आता रस्त्यावरुन जातांना सोलार दिव्यांचा उजेड मिळणार आहे.  

आदिवासी पाड्यात घरे दूरदूरवर असतात तसेच सर्व आदिवासी पाड्यावर विजेच्या जोडण्या दिलेल्या नाहीत. जरी घरात वीज आली असली तरी पाड्यांकडे जाणारे रस्ते, आदीवासी पाडे येथे पथदिवे नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेले तसेच वन खात्याच्या हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर दिवे लावण्यासाठी वन विभागाची परवानगी मिळत नाही. अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब, वीज तारा टाकण्यासाठी अडचणी येतात. तसेच वन विभागाचा ना हरकत दाखला, परवानगी मिळत नसल्याने आजवर अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत. तसेच रात्रीच्या वेळेस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी शिकार करण्यासाठी बाहेर पडून जवळच असलेल्या आदिवासी पाड्यांतील रस्त्यांवर येतात त्यामुळे रस्त्यांवर पथदिवे नसल्याने तेथील आदिवासी नागरिकांवर हिंस्त्र पशुंचे हल्ले होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस घरी जाताना वाट काढणे कठीण होते.  

त्याचप्रमाणे पथदिवे नसल्याने सायंकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुले व जेष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे या पाड्यांवर पथदिवे लावण्यासाठी सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार यासाठी ५ कोटींचा निधी मंजुर झाला असून आता लवकरच या भागात सोलार दिवे लावले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या कामाची आता निविदा प्रक्रिया झाल्यामुळे हे सोलर दिवे लावण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सौर पथदिवे या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी साधारण १० ते ११ तास पुरेल इतकी उर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते. शिवाय यामध्ये दिवे चालू व बंद करण्यासाठी एक स्वयंचलित बटन देखील असते जे सायंकाळ ते पहाट या कालावधीत दिवे वापरण्यासाठी बनविलेले असते तसेच बॅटरीला अतिरिक्त चार्ज होण्यापासून तसेच ती अतिरिक्त ड्रेन होण्यापासून म्हणजे तिची ताकद पूर्णपणे संपण्यापासून रोखते, असेही सांगण्यात आले.