शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

जीवघेणा चमकी बुखार कल्याणात; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 00:02 IST

पालिकेने घेतले नमुने

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील वाडेघर परिसरात राहणाऱ्या श्लोक कृष्णा मल्ला या सातवर्षीय मुलाचा एएनईसी (अक्यूट नेक्रोटाइझिंग इन्सेफाल्टीस) या मेंदूज्वराने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. बिहारमध्ये चमकी बुखारने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. श्लोकचा मृत्यू ज्या मेंदूज्वराने झाला आहे, त्यात चमकी बुखारसारखीच लक्षणे दिसून आली आहेत. यापूर्वी आणखी एका चारवर्षीय मुलीचा याच प्रकारच्या मेंदूज्वराने याच रुग्णालयात मृत्यू झाल्याने कल्याणमध्ये जीवघेण्या चमकी बुखारने शिरकाव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

श्लोकचे वडील कृष्णा हे ठाण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात ते राहतात. त्यांचा मुलगा श्लोक हा कोनगावच्या इंग्रजी शाळेत शिकत होता. २२ जुलै रोजी श्लोकला ताप आल्याने त्यांनी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला तपासून औषध दिले. मात्र, त्याचा ताप काही कमी होत नसल्याने, त्याला २३ जुलै रोजी पुन्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी त्याच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. २४ जुलै रोजी श्लोकची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी मेंदूत ताप गेल्याने त्याला उलटी झाली. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

एएनसीई या प्रकारच्या मेंदूज्वराने श्लोकचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, याच रुग्णालयात याच प्रकारच्या मेंदूज्वराने बाधित झालेल्या चार वर्षांच्या तनुजा सावंतला तिच्या पालकांनी उपचारासाठी आणले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वैद्यकीय चाचण्या करण्यापूर्वीच तिचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी सांगितले की, श्लोकचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्याचे वैद्यकीय नमुने घेतले आहे. ते अंतिम तपासणीकरिता पुणे येथे पाठवले जातील. त्यानंतर, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. श्लोक राहत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. त्याठिकाणी तापाचे रुग्ण किती आहेत, या आजाराची लागण अन्य कोणाला झाली आहे का, याची माहिती घेऊन उपाययोजना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर वानखेडे यांनी सांगितले की, चमकी बुखार कल्याणात येऊन ठेपला. त्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला, तरी महापालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.