शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा चमकी बुखार कल्याणात; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 00:02 IST

पालिकेने घेतले नमुने

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील वाडेघर परिसरात राहणाऱ्या श्लोक कृष्णा मल्ला या सातवर्षीय मुलाचा एएनईसी (अक्यूट नेक्रोटाइझिंग इन्सेफाल्टीस) या मेंदूज्वराने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. बिहारमध्ये चमकी बुखारने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. श्लोकचा मृत्यू ज्या मेंदूज्वराने झाला आहे, त्यात चमकी बुखारसारखीच लक्षणे दिसून आली आहेत. यापूर्वी आणखी एका चारवर्षीय मुलीचा याच प्रकारच्या मेंदूज्वराने याच रुग्णालयात मृत्यू झाल्याने कल्याणमध्ये जीवघेण्या चमकी बुखारने शिरकाव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

श्लोकचे वडील कृष्णा हे ठाण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात ते राहतात. त्यांचा मुलगा श्लोक हा कोनगावच्या इंग्रजी शाळेत शिकत होता. २२ जुलै रोजी श्लोकला ताप आल्याने त्यांनी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला तपासून औषध दिले. मात्र, त्याचा ताप काही कमी होत नसल्याने, त्याला २३ जुलै रोजी पुन्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी त्याच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. २४ जुलै रोजी श्लोकची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी मेंदूत ताप गेल्याने त्याला उलटी झाली. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

एएनसीई या प्रकारच्या मेंदूज्वराने श्लोकचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, याच रुग्णालयात याच प्रकारच्या मेंदूज्वराने बाधित झालेल्या चार वर्षांच्या तनुजा सावंतला तिच्या पालकांनी उपचारासाठी आणले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वैद्यकीय चाचण्या करण्यापूर्वीच तिचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी सांगितले की, श्लोकचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्याचे वैद्यकीय नमुने घेतले आहे. ते अंतिम तपासणीकरिता पुणे येथे पाठवले जातील. त्यानंतर, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. श्लोक राहत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. त्याठिकाणी तापाचे रुग्ण किती आहेत, या आजाराची लागण अन्य कोणाला झाली आहे का, याची माहिती घेऊन उपाययोजना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर वानखेडे यांनी सांगितले की, चमकी बुखार कल्याणात येऊन ठेपला. त्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला, तरी महापालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.