शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

जीवघेणा चमकी बुखार कल्याणात; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 00:02 IST

पालिकेने घेतले नमुने

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील वाडेघर परिसरात राहणाऱ्या श्लोक कृष्णा मल्ला या सातवर्षीय मुलाचा एएनईसी (अक्यूट नेक्रोटाइझिंग इन्सेफाल्टीस) या मेंदूज्वराने खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. बिहारमध्ये चमकी बुखारने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. श्लोकचा मृत्यू ज्या मेंदूज्वराने झाला आहे, त्यात चमकी बुखारसारखीच लक्षणे दिसून आली आहेत. यापूर्वी आणखी एका चारवर्षीय मुलीचा याच प्रकारच्या मेंदूज्वराने याच रुग्णालयात मृत्यू झाल्याने कल्याणमध्ये जीवघेण्या चमकी बुखारने शिरकाव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

श्लोकचे वडील कृष्णा हे ठाण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात ते राहतात. त्यांचा मुलगा श्लोक हा कोनगावच्या इंग्रजी शाळेत शिकत होता. २२ जुलै रोजी श्लोकला ताप आल्याने त्यांनी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला तपासून औषध दिले. मात्र, त्याचा ताप काही कमी होत नसल्याने, त्याला २३ जुलै रोजी पुन्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी त्याच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. २४ जुलै रोजी श्लोकची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी मेंदूत ताप गेल्याने त्याला उलटी झाली. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

एएनसीई या प्रकारच्या मेंदूज्वराने श्लोकचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, याच रुग्णालयात याच प्रकारच्या मेंदूज्वराने बाधित झालेल्या चार वर्षांच्या तनुजा सावंतला तिच्या पालकांनी उपचारासाठी आणले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वैद्यकीय चाचण्या करण्यापूर्वीच तिचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी सांगितले की, श्लोकचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्याचे वैद्यकीय नमुने घेतले आहे. ते अंतिम तपासणीकरिता पुणे येथे पाठवले जातील. त्यानंतर, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. श्लोक राहत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. त्याठिकाणी तापाचे रुग्ण किती आहेत, या आजाराची लागण अन्य कोणाला झाली आहे का, याची माहिती घेऊन उपाययोजना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर वानखेडे यांनी सांगितले की, चमकी बुखार कल्याणात येऊन ठेपला. त्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला, तरी महापालिका ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.