शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील गरीब - कष्टकऱ्यांसाठी आता आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:47 IST

ठाणे : जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपही ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबियांना या आरोग्य योजनेचा लाभप्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपहीजिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ८३ हजार ८९३ तर शहरी भागात दोन लाख ६५ हजार कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ

ठाणे : जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपही यावेळी केले. जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबियांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल.पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात अलका धोंगडे, शंकर घोडे, जयेश गोडे, सुमन इतरकर, रु पाली धोंगडे, मानसी भगत, चंद्रकांत साबळे, लक्ष्मी घोडे, सखुबाई आदी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड देण्यात आले.सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते, आरोग्य विमा प्रीमियम हप्ते भरणाऱ्यां  लोकांनाही ते मिळते पण गरीब आणि दुर्बल घटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर पैशाअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत. पण आयुष्यमान भारत योजनेमुळे संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशभरातील सरकारी रु ग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तशीच लवकरच बहुसंख्य खासगी रु ग्णालये देखील यात समाविष्ट करण्यात येतील, असे जावडेकर यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केले. कथोरे व कपिल पाटील यांनी देखील या योजनेमुळे वैद्यकीय लाभ मोठ्या प्रमाणावर गरिबांना मिळून या क्षेत्रात क्र ांती येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले की कोणत्याही शहराचा हैपी इंडेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे यावरही अवलंबून आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही ही त्यांनी दिली.जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ८३ हजार ८९३ तर शहरी भागात दोन लाख ६५ हजार कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रु ग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रु ग्णालये या योजनेसाठी संलिग्नत करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत एक हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे............. 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी