शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

शिरवली येथील दुकानाचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST

मुरबाड : विधवेच्या नावावर असलेल्या रेशन दुकानावर येणाऱ्या धान्यांचा अपहार होत असल्याने पुरवठा निरीक्षकांनी दुकानाला भेट देताच मारुती दळवी ...

मुरबाड : विधवेच्या नावावर असलेल्या रेशन दुकानावर येणाऱ्या धान्यांचा अपहार होत असल्याने पुरवठा निरीक्षकांनी दुकानाला भेट देताच मारुती दळवी या तोतया दुकानदाराचा भंडाफोड झाला. जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांनी या दुकानाचा परवाना रद्द केल्याची कारवाई केली आहे.

तालुक्यातील शिरवली येथील रास्त भाव धान्य दुकान हे विमल पांडुरंग घागस या विधवेच्या नावावर आहे. मात्र चार दुकाने चालविणारा मारुती याच्याकडे सरकारचे कोणतेही अधिकार पत्र नसताना तो अधिकाऱ्यांच्या संगनमताने रास्त भाव धान्य दुकाने ही ऑनलाइन असताना ऑफलाइन चालवत आहे. मात्र, सरकारकडून येणारे मोफत धान्य हे जाते कुठे? याचा जाब पुरवठा विभागाला विचारताच पुरवठा निरीक्षक स्मिता फडाळे यांनी शिरवली येथील दुकानाला भेट दिली. दुकानात आजपर्यंत किती धान्य आले व किती कार्डधारकांना वाटप केले याची नोंद असणारे रजिस्टर उपलब्ध नाही. तसेच साठा रजिस्टर, शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या पावत्यांचे रजिस्टर, सरकारची नियमावली, स्थानिक दक्षता कमिटी फलक, मालाचे नमुने दर्शविणारी भांडी अशा कोणत्याही गोष्टी दुकानात आढळल्या नाहीत. ३१ शिधापत्रिका तपासून त्या कार्डधारकांचे जबाब घेतले. त्यातून १८ जणांना अल्प प्रमाणात धान्य दिले आहे तर १३ जणांना धान्यच मिळाले नाही. साखर तर या दुकानात येतच नाही. या मुद्द्यांची चौकशी करत असताना हे दुकान सांभाळणारे मारुती याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले.

तहसीलदार अमोल कदम यांनी दुकानदारावर पुढील कारवाई करावी, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल सादर केला. जिल्हा पुरवठा अधिकारी थोटे यांनी या दुकानात गोरगरिबांच्या धान्यांचा अपहार होत असल्याने त्याला एक हजार दंड ठोठावला असून दुकानाचा परवाना रद्द केला आहे. या अगोदर त्याच्यावर अनेक वेळा निलंबनाची कारवाई झाली आणि तो चालवत असलेल्या मानिवली २, मुरबाडमधील ३ दुकानांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

--------------------------------------

तालुक्यात एकूण १९६ दुकाने

मुरबाड तालुक्यात एकूण १९६ रेशनिंगची दुकाने असून त्यापैकी १९ दुकाने खरेदी-विक्री संघाकडे तर ५५ दुकाने ही महिला बचत गटाकडे आहेत. उर्वरित दुकानदारांनी सरकारने आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन मिळावे म्हणून ती दुकाने घेतली असली तरी त्यापैकी ३५ ते ४० दुकानदारांनी आपसात या दुकानांचा लिलाव करून तसे हमीपत्र तहसीलदारांना दिले असले तरी त्या हमीपत्रांना मान्यता मिळाली नसल्याने ही दुकाने बेकायदा चालवली जात आहेत.