शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक

By पंकज पाटील | Updated: April 25, 2023 18:23 IST

अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्याचा स्थानिकांचा आरोप

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्यामुळे अभ्यासिका पूर्णपणे भस्मसात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अंबरनाथ पूर्वेतील कानसई दत्त मंदिर परिसरात मनोहर कला सांस्कृतिक केंद्राच्या आवारात ही अभ्यासिका होती. या अभ्यासिकेत परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले आणि विद्यार्थी येऊन अभ्यास करायचे. या अभ्यासिकेला रविवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. यावेळी स्थानिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला, मात्र अग्निशमन दलाची गाडी उशिरा आली आणि तोपर्यंत संपूर्ण अभ्यासिका आगीत जळून खाक झाली.

अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरात आहे. हा भाग शहराच्या एका टोकाला असून तिथून अंबरनाथ पूर्वेत कुठेही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागतो. त्यामुळे अशा आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप कानसई परिसरातील स्थानिक रहिवासी आणि भाजपचे पदाधिकारी संजय आदक यांनी केला आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे ही तक्रार केली असून त्यानुसार लवकरच शिवमंदिर परिसरातील मैदानावर अग्निशमन दलासाठी तात्पुरता शेड उभारून उपकेंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना दिल्याची माहिती आदक यांनी दिली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ