शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

सांस्कृतिक नगरीतील वाचनालयांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:07 IST

वाचकसंख्या टिकवण्याचे आव्हान : डोंबिवलीत २८ वर्षांमध्ये १२२ ग्रंथालये बंद

- जान्हवी मोर्ये।डोंबिवली : तरुण पिढी सोशल मीडिया, टीव्ही, आॅनलाइन गेम यासारख्या माध्यमांना पसंती देत आहे. तसेच त्यांना तंत्रज्ञान, विज्ञान याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने वाचनाचा ट्रेण्ड बदलत आहे. या पार्श्वभूमीवर वाचनालयांना वाचकसंख्या टिकवणे महाकठीण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून ९० च्या दशकात अस्तित्वात असलेल्या १३६ वाचनालयांपैकी डोंबिवलीत केवळ १४ वाचनालये उरली आहेत. त्यातील ‘आवड वाचनालय’ हेही लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.

वाचकांची वाचनरुची काळानुसार बदलत आहे. त्यामुळे वाचकसंख्या टिकवण्यासाठी नवी पुस्तके खरेदी करावी लागतात. त्यासाठी वाचनालयातील जागा अपुरी पडते. आम्ही एकाच वेळी तीन पुस्तके देतो. आईवडिलांनी सदस्यत्व स्वीकारले तर बालविभागातील एक पुस्तक लहानग्यांना मोफत देऊ न काही प्रमाणात अपुऱ्या जागेच्या समस्येवर मात करत आहोत, असे डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा म्हणाले. सभासद स्वत: पुस्तक निवडू शकतात. ‘लेखक आपल्या भेटीला’ यासारख्या कार्यक्रमांतून विविध लेखकांच्या पुस्तकांचा परिचय वाचकांना करून देतो. घरपोच सेवाही आम्ही देत होतो, मात्र अपुºया मनुष्यबळामुळे ती बंद केली. आमच्या वाचनालयाला नवीन जागा मिळावी, ही आमची मुख्य मागणी आहे. तरुणांना हवी असलेली पुस्तके उपलब्ध न झाल्यास ती ई-बुक्सकडे वळतात, असेही त्यांनी सांगितले.

प्र. के. अत्रे वाचनालयाच्या व्यवस्थापनाने तरुणाई ई-बुक्सकडे वळत असल्याने वाचनालयातील वाचकांची संख्या कमी होत आहे. आमच्या वाचनालयाचा उद्देश नफा कमावणे नसून वाचनाची आवड निर्माण करणे, हा आहे. त्यामुळे वाचक वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. वाचकांना नवीन पुस्तके हवी असतात. पण, नवीन पुस्तके खरेदी करताना त्यांच्या किमती आणि वाचनालयाची फी यांचा ताळमेळ घालणे वाचनालयांना कठीण होते. गणेश मंदिर संस्थान हे वाचनालय एक मिशन म्हणून चालवत आहे. १२०० दिवाळी अंक , बालविभागासाठी नवनवीन गोष्टींची पुस्तके या माध्यमातून वाचकांची आवड जपण्याचा प्रयत्न करत आहोत. वाचनालयात पुस्तके आणून काम संपत नाही. त्यांची पाने फाटली, तर बायंडिंग आणि वाळवी लागू नये म्हणून दक्षता घ्यावी लागते.‘आवड’चे दत्तात्रेय नेरूरकर म्हणाले की, लोकांमध्ये पूर्वी वाचनाची आवड होती. ललित लेखन हा साहित्य प्रकार मोठ्या प्रमाणावर वाचला जायचा. त्यावेळी ४०० च्या आसपास वाचक होते. आता घरातील वडीलधारी मंडळी वाचत नसल्याने मुलेही वाचत नाही. आता वाचकांची संख्या ३५ वर गेली आहे. त्यातील १५ वाचक नियमित येतात. इंग्रजी माध्यमामुळे मुले मराठी पुस्तके वाचत नाहीत. त्यामुळे हे वाचनालय आता बंद करत आहे.वाचनालयांनी काळानुरूप बदलले पाहिजे : पुंडलिक पैपै फे्रण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै म्हणाले की, वाचकसंख्या कमी झालेली नाही. वाचनालयाची वेळ वाचकांना जमत नाही. नवीन पुस्तके आणली नाहीत, तर लोकांना माध्यमे खूप आहेत. या व्यवसायात रिटर्न कमी असल्याने नवीन पिढी उतरत नाही. नवीन पिढीला फेसबुक, टीव्ही अशी विविध माध्यमे आहेत. आपण अजून सहा वाचनालये सुरू करत आहोत. वाचकांना घरपोच सेवा देतो. वाचकांना ज्या सोयीसुविधा हव्या आहेत, त्या दिल्या गेल्या पाहिजेत, तरच वाचक वाढतील. वाचनालये काळानुरूप न बदलल्यामुळे ती बंद पडलीत, असे वाटते.