शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:21 IST

जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते.

डोंबिवली : जिल्हा कार्यकारीणीच्या नवीन नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी पसरली असताना त्याचे सावट सोमवारच्या लोकसंवाद कार्यक्रमावरही होते. या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाकडे तरुण कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या एकूणच वातावरणाबाबत वक्त्यांनीही खडेबोल सुनावले.डोंबिवलीतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान हा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रदेश प्रवक्ते आणि लोकसंवादचे प्रदेश मुख्य समन्वयक विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि पत्रकार विजय राऊत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे डोंबिवली शहर विधानसभा क्षेत्र माजी उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर यांनी केले होते. तरुण कार्यकर्ते व अचलकर यांच्या सहकाºयांनीही या कार्यक्रमाला नाराजीमुळे उपस्थित न राहणे पसंत केले.जिल्हाध्यक्ष हनुमंते, सारीका गायकवाड, राजेश शिंदे, संदीप देसाई, मनोज नायर, उमेश बोरगावकर या आजी-माजी पदाधिकाºयांसह काही मोजक्याच मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. यावर सुटीच्या दिवशी कार्यक्रम नव्हता. त्यात पक्षामध्ये बहुतांश नोकरदार वर्ग आहे, त्यामुळे सर्वांनाच सोमवारच्या लोकसंवादाला उपस्थित राहता आले नाही, अशी सारवासारव उपस्थित पदाधिकाºयांनी केली.दरम्यान, मतभेद असावेत, पण मनभेद असू नये, मन जुळली पाहिजेत, अन्यथा कितीही प्रशिक्षणे दिली तरी काही फायदा होणार नाही. पद आपल्याला मोठे करीत नाही तर आपल्या कामामुळे पद मोठे होते, असे काम करा की पक्षाकडून तुमची दखल घेतली गेली पाहिजे, नियुक्त्यांवर काही जण बोलणारच, पण एकमेकांचे पाय ओढू नका पक्षवाढीसाठी काम करा, अशा शब्दांत वक्ते विकास लवांडे यांनी खडेबोल उपस्थितांना सुनावले.>भाजपा सरकारवर खरपूस टीकाभाजपाला संसदीय लोकशाही मान्य नाही, ते अध्यक्षीय लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. ज्यांनी आयुष्यभर नथुराम गोडसेंची पूजा केली त्या भाजपाने गांधींना हायजॅक केले आहे, तर पंडित नेहरूंना खलनायक बनविले जात आहे. विकासाची कोणतेही मुद्दे दाखविता येत नसल्याने राममंदिराचा मुद्दा पुन्हा उचलण्यात आला आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना याबाबत कायदा कसा होऊ शकतो, असा टोला या वेळी वक्ते विकास लवांडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.