शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ठाकरेबंधूंची संमेलनाकडे पाठ

By admin | Updated: February 6, 2017 04:42 IST

मराठी भाषाभिमानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे आम्हीच ठेकेदार असल्याचा दावा करणारे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण

पु.भा. भावे साहित्यनगरी, (डोंबिवली) : मराठी भाषाभिमानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे आम्हीच ठेकेदार असल्याचा दावा करणारे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकडे चक्क पाठ फिरवली. राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने हे दोघे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. भाजपाच्या नेत्यांनी नेमकी हीच संधी साधत संमेलन हायजॅक केले.मराठी भाषा आणि मराठी माणसाचे राजकारण हा शिवसेना व मनसेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर संमेलनाच्या समारोप सत्राला उद्धव ठाकरे यांना हजर राहण्याचे निमंत्रण दिले होते. दोघांनीही कार्यक्रमांना दांडी मारली. राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले आहे, तर मनसे अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे ठाकरेबंधूंनी संमेलनाला येण्याचे टाळले. युती तुटल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांसोबत व्यासपीठावर एकत्र येण्याचे टाळले असले, तरी संमेलनाचे व्यासपीठ हे बिगर राजकीय आहे. राजकारणातील मतभेद व्यक्त करण्याचे हे ठिकाण नाही, असे मत एका साहित्यिकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केले. नेमकी हीच संधी साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी अनुक्रमे उद्घाटन व समारोप कार्यक्रमाला हजेरी लावून भाजपाचा संमेलनावरील वरचष्मा सिद्ध केला.उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीपेक्षा जास्त खटकली, ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरहजेरी. डोंबिवलीमधील हे संमेलन भाजपाने हायजॅक केल्याची ओरड शिवसेना सुरुवातीपासून करत होती. मात्र, जेव्हा हजर राहून हे संमेलन केवळ भाजपाने आपल्याकडे खेचलेले नाही, हे दाखवून देण्याची संधी आली, तेव्हा शिंदे हजर राहिले नाहीत. शिंदे हे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण शिवसैनिक देत होते. मात्र, त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही संमेलनाकडे दुर्लक्ष केले. डोंबिवलीतील शिवसेनेची संमेलनाबाबत अनास्था एवढी भीषण होती की, मातब्बर साहित्यिक, रसिक व हजारो विद्यार्थी ग्रंथदिंडी घेऊन निघाले, तेव्हा शिवसेना शाखेपाशी ग्रंथदिंडीचे स्वागत करायलाही कुणी हजर नव्हते. एकदोन शिवसैनिकांनी तर आम्ही मराठीप्रेमी असल्याचे सांगायला लाज वाटते, इतकी उदासीनता आमच्या पक्षाने संमेलनाबाबत दाखवली, असे खासगीत कबूल केले. (विशेष प्रतिनिधी)