शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'आरक्षित भूखंड मोकळे करून द्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:38 IST

सद्य:स्थितीत कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला अतिक्रमणविरोधात जोमाने सुरू असलेली कारवाई पाहता आमचे आरक्षित भूखंड मोकळे करून द्या, अशी मागणी आता कल्याणमधील फेरीवाल्यांकडून होत आहे.

कल्याण : सद्य:स्थितीत कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला अतिक्रमणविरोधात जोमाने सुरू असलेली कारवाई पाहता आमचे आरक्षित भूखंड मोकळे करून द्या, अशी मागणी आता कल्याणमधील फेरीवाल्यांकडून होत आहे. डोंबिवलीमधील फेरीवाल्यांची ही मागणी आधीपासूनची असून कल्याणमधील फेरीवाला संघटना आता यासंदर्भात केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेणार आहेत.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानकांपासून १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र असताना सद्य:स्थितीत महापौर विनीता राणे यांनी यात जातीने लक्ष घातल्याने फेरीवाल्यांविरोधातल्या कारवाईला वेग आला आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याऐवजी कारवाईलाच प्राधान्य दिले जात असल्याने फेरीवाल्यांमध्ये कारवाईबाबत रोष आहे. नुकतीच याची प्रचीती डोंबिवलीत आली. फेरीवालाविरोधी पथकाची गाडी अडवून ठिय्या आंदोलन छेडल्याची घटना गुरुवारी घडली होती. दरम्यान, जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आमचे आरक्षित भूखंड व्यवसायासाठी मोकळे करून द्या, अशी मागणी आता होत आहे. कल्याणमधील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष अरविंद मोरे आणि प्रशांत माळी यांनी याकडे लक्ष वेधले आहे. फेरीवाल्यांना १५० मीटर परिक्षेत्रात व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेची कारवाई त्या परिक्षेत्राबाहेरही सुरू असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. ही अन्यायकारक कारवाई त्वरित थांबली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर, माळी यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत आम्हाला व्यवसायासाठी फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेले भूखंड मोकळे करून देण्याची मागणी केली आहे. २०१४ मध्ये जो सर्व्हे झाला, त्याप्रमाणे केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ९३५ फेरीवाले आढळून आले आहेत. धोरण ठरवण्यासाठी नगर पथ विके्रता समिती म्हणून गठीत केली आहे.>कारवाई थांबविण्याची मागणीया समितीच्या दोन ते तीन बैठका झाल्या. यातही आरक्षित भूखंडाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु, नगररचना विभागाकडून योग्य प्रकारे माहिती दिली जात नसल्याचे माळी यांचे म्हणणे आहे. लवकरच फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा. अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मोरे यांनी ‘लोकमत’ला दिला.