शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

किमान शिष्टाचार पाळायला शिका

By admin | Updated: April 27, 2017 23:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ७५ दशलक्ष पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन नळजोडणीवाटपाचा प्रारंभ ३० एप्रिलला होत आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ७५ दशलक्ष पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन नळजोडणीवाटपाचा प्रारंभ ३० एप्रिलला होत आहे. त्यात नेहमीप्रमाणे पालिकेने शिष्टाचाराला पायदळी न तुडवता त्याचे पालन करावे, असा सल्ला आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिला आहे. योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रकार भाजपाकडून सुरू झाला असून त्याची अपप्रवृत्ती भाजपात वाढीला लागल्याचा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना लगावला आहे. निवडणुकीच्या तोंडावर श्रेय लाटण्याची प्रथा भाजपात वाढीला लागली आहे. इतर वेळी सेनेशिवाय भाजपाचे पानही हलत नसल्याचा टोला सरनाईक यांनी मेहता यांना लगावला. एकाच पक्षाच्या दबावाखाली प्रशासनाचा कारभार चालत राहिल्यास त्याची किंमत अधिकाऱ्यांना मोजावी लागेल. ३० एप्रिलला अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरातील नवीन नळजोडणीवाटपाचा शुभारंभ होईल. यामुळे शहरातील पाण्याची समस्या काहीअंशी मार्गी लागेल. त्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य मिळाले. उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी कोट्यातील ७५ दशलक्ष पाणी शहराला उपलब्ध केले असले, तरी जलसंपदामंत्र्यांनी बारवी धरणातील आरक्षित पाणीसाठा देण्यास मान्यता दिल्याने पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला. यानुसार, एकाच पक्षाच्या मंत्र्याने प्रयत्न केले म्हणणे चुकीचे आहे. श्रेय लाटण्याचा सुरू असलेला एक कलमी कार्यक्रम हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)