शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अस्वाली वाहिनीतून गळती

By admin | Updated: April 7, 2016 01:06 IST

या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्वाली धरणाच्या जलवाहिनीमधून प्रतिदिन हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभाग अनभिज्ञ आहे.

बोर्डी : या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्वाली धरणाच्या जलवाहिनीमधून प्रतिदिन हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभाग अनभिज्ञ आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसामुळे जलस्रोत आटले आहेत. आगामी काळात जलसंकटाची छाया गडद होत असल्याने या जलवाहिन्यांची तत्काळ दुरुस्ती करून गळती थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.बोर्डी परिसरातील पश्चिम घाटाच्या बारडा या डोंगररांगांतून उगम पावणाऱ्या नदीच्या व पावसाच्या पाण्यावर अस्वाली ग्रामपंचायतीच्या पूर्वेला लघुपाटबंधारे विभागाने धरण बांधले आहे. त्याच्या सिंचनाखाली येणारे हे क्षेत्र आदिवासी भागातील असून त्यामुळे चिकू, नारळ या बागायतींसह दुबार शेतीसाठी वरदान ठरले आहे. शासकीय योजनेद्वारे घोलवड ग्रामपंचायत आणि झाई, बोरीगाव या ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत गावपाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. याकरिता अस्वाली ग्रामपंचायतीच्या हद्दीतून भूमिगत जलवाहिनी बांधण्यात आली आहे. ती मधून अस्वाली ग्रामपंचायत आणि शासकीय आश्रमशाळानजीक तसेच दांडेकरपाडा येथे गळती होऊन पाणी वाया जात आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलस्रोतांची पातळी खाली गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात या नासाडीची भर पडते आहे.