शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

अस्वाली वाहिनीतून गळती

By admin | Updated: April 7, 2016 01:06 IST

या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्वाली धरणाच्या जलवाहिनीमधून प्रतिदिन हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभाग अनभिज्ञ आहे.

बोर्डी : या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्वाली धरणाच्या जलवाहिनीमधून प्रतिदिन हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभाग अनभिज्ञ आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसामुळे जलस्रोत आटले आहेत. आगामी काळात जलसंकटाची छाया गडद होत असल्याने या जलवाहिन्यांची तत्काळ दुरुस्ती करून गळती थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.बोर्डी परिसरातील पश्चिम घाटाच्या बारडा या डोंगररांगांतून उगम पावणाऱ्या नदीच्या व पावसाच्या पाण्यावर अस्वाली ग्रामपंचायतीच्या पूर्वेला लघुपाटबंधारे विभागाने धरण बांधले आहे. त्याच्या सिंचनाखाली येणारे हे क्षेत्र आदिवासी भागातील असून त्यामुळे चिकू, नारळ या बागायतींसह दुबार शेतीसाठी वरदान ठरले आहे. शासकीय योजनेद्वारे घोलवड ग्रामपंचायत आणि झाई, बोरीगाव या ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत गावपाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. याकरिता अस्वाली ग्रामपंचायतीच्या हद्दीतून भूमिगत जलवाहिनी बांधण्यात आली आहे. ती मधून अस्वाली ग्रामपंचायत आणि शासकीय आश्रमशाळानजीक तसेच दांडेकरपाडा येथे गळती होऊन पाणी वाया जात आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलस्रोतांची पातळी खाली गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात या नासाडीची भर पडते आहे.