शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

‘सूर्या’च्या पाण्यासाठी नेते एकवटले

By admin | Updated: April 14, 2017 03:04 IST

सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड

पालघर : सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड, तालुक्यातील सभापती, नगराध्यक्ष, जिप सदस्य, प.स सदस्य, सरपंच आदींची सभा सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने १७ एप्रिल रोजी दादोबा ठाकूर सभागृहात आयोजित केली आहे.सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कावडास धरणाच्या एकूण २९९.०१ पाणी साठ्या पैकी १८२.८३ दलघमी इतके पाणी वसई-विरार व मिरा-भार्इंदर तसेच मुंबई प्राधिकरना कडे वळविण्यात आले आहे. हा प्रकल्प शेतीच्या सिंचनासाठी उभारण्यात आला व यासाठी हजारो कोटींचा खर्च आजवर करण्यात आला आहे. मात्र , २९९.०१ दलघमी पाणी साठ्यापैकी आजवर २२६.९३ दलघमी इतके पाणी बिगर सिंचनासाठी आरक्षित करण्यात आले असून यातील १८२.८३ दलघमी इतके पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर साठी आरक्षित करण्यात आले आहे. वसईला आधी तात्पुरत्या स्वरूपात सन २००७ पर्यंत हे पाणी देण्यात आले होते. वर्ष २००७ नंतर वसई-विरार महानगर पालिका स्वत:च्या पाण्यासाठीचे स्तोत्र निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, नागरीकरणाच्या रेट्यात माठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहू लागल्याने वसईकरांची पाण्याची हाव वाढत गेली आणि राजकीय डाव खेळत त्यांनी अधिक पाणी पळविल्याचे सूर्य बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यातच हे पाणी पुढे मिरा-भार्इंदरला देऊन इथल्या नागरिकांना मात्र शासनाने तहानलेले ठेवले आहे.सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्राबाहेर वळविल्याने प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी व शेतकऱ्यासमोर मोठे प्रकल्प उभे राहणार असून पालघर ग्रामीण जिल्ह्याच्या विकासावर यापुढे मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होणार आहे. या पाशर््व भूमीवर ह्या अन्याया विरु द्ध आवाज उठविणे गरजेचे असून ह्या संबंधातील सत्य समजून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. ह्यावेळी खासदार चिंतामण वणगा, आमदार अमित घोडा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, आनंद ठाकूर ई. मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने कळविले आहे.वरील तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वच पक्षाचे नेते व पदाधिकारी आपले राजकिय हेवेदावे विसरुन एकत्र येण्याने ठरवले आहे. तसचे ग्रामिण भागाचे त्याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)१९ हजार एकर शेतीला पाणी मिळणार नाहीसूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्राबाहेर नेल्याने प्रकल्प क्षेत्रातील १९ हजार एकर शेतीला आता पाणी मिळणार नाही. इतकेच नव्हे तर प्रकल्प क्षेत्रातील तहानलेल्या गावांनाही या प्रकल्पातून या पुढे पाणी मिळणार नाही. या पुढे जाऊन जिल्हा मुख्यालय व प्रस्तावित सिडको, नवनगरसाठी पाणी कुठून उपलब्ध होणार हा देखील एक प्रश्न आहे.