शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!

By अजित मांडके | Updated: March 4, 2023 21:03 IST

एकनाथ शिंदे यांनी दिला अधिकाऱ्यांना इशारा

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी आलेला आहे, त्या निधीचा योग्य विनियोग करा, हा जनतेचा पैसा आहे, त्यामुळे गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजे. परंतु तरी देखील विकास कामांमध्ये कचुराई केली किंवा हलगर्जीपणा केला तर तो खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. हलगर्जी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई देशाची राजधानी आहे, या ठिकाणच्या रस्त्यांचा कायापालट केला जात आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. तसेच ठाण्यातील रस्ते देखील खड्डे मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.  तलाव सुशोभीकरणाचे कामही ठाण्यात हाती घेण्यात आली आहेत. जोगीला तलावाचे पुनवुर्जीवण केले जात आहे. अशाच पध्दतीने ठाण्याची जी तलावांचे शहर म्हणून ओळख आहे, ती पुसु द्यायची नसल्याचेही त्यांनी सांगितले.  चांगले रस्ते, सार्वजनिक शौचालये स्वच्छ झाली पाहिजे. त्यानुसार योग्यरित्या कामे करा, झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयांकडे प्राधान्याने लक्ष द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे शहर हे बदलते आहे. रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले पाहिजे. कॉंक्रीटीकरणाची कामेही वेळेत करा असेही त्यांनी सांगितले. शहराचे एन्ट्री पॉईंट ही शहराची ओळख असते, त्यानुसार हे एन्ट्री पॉईन्ट ठाण्याची ओळख कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. ठाणेकरांचा वाहतुक कोंडीतून सुटका करायची आहे. त्यामुळे शहराच्या बाहेरुन वाहतुक नेण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून जो काही निधी मिळाला आहे, त्याचा  विनियोग करा, जनतेसाठी पैसा वापरला गेला पाहिजे. चांगले रस्ते, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालये आदींसह इतर कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. जे या कामात कचुराई करतील अशांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. तर कळवा रुग्णालयात देखील डॉक्टर चांगले काम करीत आहेत. परंतु त्यांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत, त्यामुळे जे सुविधा देत नसतील त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे,  तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे कोणीही विकासापासून वंचित ठेवला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  ठाण्याला आंतराष्ट्रीय दर्जाची ओळख निर्माण करुन देण्याचे काम तुमचे आमचे आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

क्लस्टरला लवकरच सुरूवात

क्लस्टरचा विकास लवकर केला जाणार आहे, यासाठी सिडको ला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरवात करा असेही त्यांनी सांगितले. आपल्याला संक्रमण शिबिरात राहावे लागेल अशी नागरीकांना भिती वाटत आहे. मात्र त्यांना तेथे न राहता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे