शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

लेटलतिफ डॉक्टरांमुळे कंपाउंडर करतात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:55 IST

मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेचे नियंत्रण व देखरेख नसल्याने अन्य काही आरोग्य केंद्रांमध्येही डॉक्टर वेळेत न येणे, औषधांचा तुटवडा आदी अनेक तक्रारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या भाविक पाटील या तरूणाला पालिकेच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आला. मंगळवारी सकाळी ९ वाजता गेलेल्या भाविकला डॉक्टरच विलंबाने आल्याने एक तास थांबावे लागले. ९ ची वेळ असताना १० वाजता डॉक्टर आल्या. त्या आधी डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरच रूग्णांना औषधं देत होता. त्यातही मलेरिया, मधुमेहाचे रूग्ण औषधं नसल्याने परत गेले.सेव्हन इलेव्हन रूग्णालयाच्या इमारतीत महापालिकेच्या मालकीची जागा आधीच अनेक वर्षानंतर विकसकाने पालिकेला हस्तांतरीत केली. त्यासाठी थेट लोकायुक्तांपर्यंत तक्रारी झाल्या व आंदोलने केली गेली. त्यानंतर पालिका व सत्ताधाऱ्यांनी रडतकढत हा दवाखाना सुरू केला. परंतु त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाच दुसरीकडे प्रशासनाचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. या दवाखान्यात डॉक्टर उशिराने येतात अशी तक्रार आधीपासूनच होत होती. विशेष म्हणजे महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यालया लागूनच हे आरोग्य केंद्र आहे.पेणकरपाडा येथील पालिका आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. तर पालिकेच्या एकूणच आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर - कर्मचारी विलंबाने येणे, कंपाउंडरकडून औषधे देणे, आवश्यक औषधे नसणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत. होणाºया गैरसोयींमुळे उपचारासाठी येणारे नागरिक त्रासले आहेत. तर प्रशासनाचे आरोग्य केंद्रावर नियंत्रण व लक्ष नसल्याने एकूणच कारभार रामभरोसे चालला आहे.।डॉक्टर वा कर्मचारी आरोग्य केंद्रांमध्ये विलंबाने येत असल्याच्या तक्रारी आल्या असून सर्वच आरोग्य केंद्रांना लेखी सूचना देणार आहे. कंपाउंडर हा रुग्ण तपासत नाही तर आधी आलेल्या रुग्णांनी औषधं मागितली तर ती दिली जातात. - डॉ. प्रमोद पडवळ,प्रमुख वैद्यकीय अधिकारी>लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना स्वत:ची दालने आणि फायद्याची काळजी बरोबर असते. पण नागरिकांच्या आरोग्याशी काही सोयरसूतक नसते. आरोग्य केंद्रात हे डॉक्टर - कर्मचारी उशिरा येणे, औषधं नसणे, अत्यावश्यक सुविधा - साहित्य न देणे हे नेहमीचेच झाले आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे.- निलेश साहू, स्थानिक नागरिक