शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लेटलतिफ डॉक्टरांमुळे कंपाउंडर करतात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:55 IST

मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेचे नियंत्रण व देखरेख नसल्याने अन्य काही आरोग्य केंद्रांमध्येही डॉक्टर वेळेत न येणे, औषधांचा तुटवडा आदी अनेक तक्रारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या भाविक पाटील या तरूणाला पालिकेच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आला. मंगळवारी सकाळी ९ वाजता गेलेल्या भाविकला डॉक्टरच विलंबाने आल्याने एक तास थांबावे लागले. ९ ची वेळ असताना १० वाजता डॉक्टर आल्या. त्या आधी डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरच रूग्णांना औषधं देत होता. त्यातही मलेरिया, मधुमेहाचे रूग्ण औषधं नसल्याने परत गेले.सेव्हन इलेव्हन रूग्णालयाच्या इमारतीत महापालिकेच्या मालकीची जागा आधीच अनेक वर्षानंतर विकसकाने पालिकेला हस्तांतरीत केली. त्यासाठी थेट लोकायुक्तांपर्यंत तक्रारी झाल्या व आंदोलने केली गेली. त्यानंतर पालिका व सत्ताधाऱ्यांनी रडतकढत हा दवाखाना सुरू केला. परंतु त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाच दुसरीकडे प्रशासनाचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. या दवाखान्यात डॉक्टर उशिराने येतात अशी तक्रार आधीपासूनच होत होती. विशेष म्हणजे महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यालया लागूनच हे आरोग्य केंद्र आहे.पेणकरपाडा येथील पालिका आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. तर पालिकेच्या एकूणच आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर - कर्मचारी विलंबाने येणे, कंपाउंडरकडून औषधे देणे, आवश्यक औषधे नसणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत. होणाºया गैरसोयींमुळे उपचारासाठी येणारे नागरिक त्रासले आहेत. तर प्रशासनाचे आरोग्य केंद्रावर नियंत्रण व लक्ष नसल्याने एकूणच कारभार रामभरोसे चालला आहे.।डॉक्टर वा कर्मचारी आरोग्य केंद्रांमध्ये विलंबाने येत असल्याच्या तक्रारी आल्या असून सर्वच आरोग्य केंद्रांना लेखी सूचना देणार आहे. कंपाउंडर हा रुग्ण तपासत नाही तर आधी आलेल्या रुग्णांनी औषधं मागितली तर ती दिली जातात. - डॉ. प्रमोद पडवळ,प्रमुख वैद्यकीय अधिकारी>लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना स्वत:ची दालने आणि फायद्याची काळजी बरोबर असते. पण नागरिकांच्या आरोग्याशी काही सोयरसूतक नसते. आरोग्य केंद्रात हे डॉक्टर - कर्मचारी उशिरा येणे, औषधं नसणे, अत्यावश्यक सुविधा - साहित्य न देणे हे नेहमीचेच झाले आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे.- निलेश साहू, स्थानिक नागरिक