शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

सरांची अखेरची भेट झालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:57 IST

निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते.

कल्याण : निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते. आजही सकाळी कुलाब्याहून वासिंदला जाण्यासाठी गाडी पकडली. कल्याणला गाडी आली तेव्हा फोनवरून मला दु:खद बातमी कळाली की, सरांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची अखेरची भेट झालीच नाही, अशी खंत ३५ वर्षे गोरक्षकर यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी रवी चाफे यांनी व्यक्त केली आहे.चाफे यांनी सांगितले की, ‘मी १९९३ पासून प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियममध्ये (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) रोजंदारीवर कामाला लागलो. तेव्हापासून गोरक्षकर यांचा माझा संबंध होता. नव्या व जुन्या मुलांना सोबत घेऊन ते काम करत होते. एखाद्या वेळी आमच्या हातून चूक झाली, तर कधीही त्यांनी मला चारचौघांत सुनावले नाही. एकट्याला बाजूला घेऊन ते माझी चूक निदर्शनास आणून देत होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना होता. तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला होता. त्यांनी प्रदर्शने भरविली. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असता देशातील विविध राज्यांत आणि परदेशांत जाण्याची संधी मला मिळाली.’ते पुढे म्हणाले, ‘प्रदर्शनात एखादी वस्तू मांडली असेल तर त्यावर प्रकाश नीट पडला आहे का? की त्यावर सावली पडली आहे का, याचे बारीक निरीक्षण ते करीत होते. त्यातले आम्हाला काही कळत नसताना आमच्याकडून ते पुन:पुन्हा खात्री करून घेत असत. वस्तूवर प्रकाश पडतो आहे का, याची विचारणा करीत. इतका मोठा माणूस आमच्या पातळीवर येऊन काम करीत होता. यातच मला व माझ्या सहकाऱ्यांना मोठेपणा वाटत होता. दरम्यान, त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांना मधूनमधून मी भेटत होतो. आजही त्यांच्या भेटीला निघालो होतो. कल्याणपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हा मला मोठा धक्का बसला. अखेर, त्यांची अखेरची भेट होऊ शकली नाही, याचे शल्य मला कायम राहणार आहे.’>पद्मश्री किताबाने गौरवगोरक्षकर यांच्या काळात म्युझियममध्ये लिफ्ट बसवली गेली. तसेच म्युझियमभोवती संरक्षक भिंत बांधली गेली. भारतातील गोष्टी व म्युझियम जगात नेण्याचे काम सरांनी केले. त्यात त्यांचे वेगळपण होते. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २००२ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविले होते. हा किताब मिळाल्यावर त्यांच्या वागण्याबोलण्यात व कामात कुठलाही फरक जाणवला नाही.>कुटुंबाचीमोठी हानीगोरक्षकर यांची भाची स्मिता गुप्ते यांनी सांगितले की, त्यांचे नाव खूप मोठे होते. आमच्या कुटुंबात त्यांना पद्मश्री मिळाली, हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्याकडून खूप लोक शिकले. सगळ्यांना त्यांनी ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्याची अपेक्षा कधीही केली नाही. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.