शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सरांची अखेरची भेट झालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:57 IST

निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते.

कल्याण : निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते. आजही सकाळी कुलाब्याहून वासिंदला जाण्यासाठी गाडी पकडली. कल्याणला गाडी आली तेव्हा फोनवरून मला दु:खद बातमी कळाली की, सरांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची अखेरची भेट झालीच नाही, अशी खंत ३५ वर्षे गोरक्षकर यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी रवी चाफे यांनी व्यक्त केली आहे.चाफे यांनी सांगितले की, ‘मी १९९३ पासून प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियममध्ये (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) रोजंदारीवर कामाला लागलो. तेव्हापासून गोरक्षकर यांचा माझा संबंध होता. नव्या व जुन्या मुलांना सोबत घेऊन ते काम करत होते. एखाद्या वेळी आमच्या हातून चूक झाली, तर कधीही त्यांनी मला चारचौघांत सुनावले नाही. एकट्याला बाजूला घेऊन ते माझी चूक निदर्शनास आणून देत होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना होता. तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला होता. त्यांनी प्रदर्शने भरविली. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असता देशातील विविध राज्यांत आणि परदेशांत जाण्याची संधी मला मिळाली.’ते पुढे म्हणाले, ‘प्रदर्शनात एखादी वस्तू मांडली असेल तर त्यावर प्रकाश नीट पडला आहे का? की त्यावर सावली पडली आहे का, याचे बारीक निरीक्षण ते करीत होते. त्यातले आम्हाला काही कळत नसताना आमच्याकडून ते पुन:पुन्हा खात्री करून घेत असत. वस्तूवर प्रकाश पडतो आहे का, याची विचारणा करीत. इतका मोठा माणूस आमच्या पातळीवर येऊन काम करीत होता. यातच मला व माझ्या सहकाऱ्यांना मोठेपणा वाटत होता. दरम्यान, त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांना मधूनमधून मी भेटत होतो. आजही त्यांच्या भेटीला निघालो होतो. कल्याणपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हा मला मोठा धक्का बसला. अखेर, त्यांची अखेरची भेट होऊ शकली नाही, याचे शल्य मला कायम राहणार आहे.’>पद्मश्री किताबाने गौरवगोरक्षकर यांच्या काळात म्युझियममध्ये लिफ्ट बसवली गेली. तसेच म्युझियमभोवती संरक्षक भिंत बांधली गेली. भारतातील गोष्टी व म्युझियम जगात नेण्याचे काम सरांनी केले. त्यात त्यांचे वेगळपण होते. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २००२ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविले होते. हा किताब मिळाल्यावर त्यांच्या वागण्याबोलण्यात व कामात कुठलाही फरक जाणवला नाही.>कुटुंबाचीमोठी हानीगोरक्षकर यांची भाची स्मिता गुप्ते यांनी सांगितले की, त्यांचे नाव खूप मोठे होते. आमच्या कुटुंबात त्यांना पद्मश्री मिळाली, हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्याकडून खूप लोक शिकले. सगळ्यांना त्यांनी ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्याची अपेक्षा कधीही केली नाही. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.