शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सरांची अखेरची भेट झालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:57 IST

निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते.

कल्याण : निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते. आजही सकाळी कुलाब्याहून वासिंदला जाण्यासाठी गाडी पकडली. कल्याणला गाडी आली तेव्हा फोनवरून मला दु:खद बातमी कळाली की, सरांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची अखेरची भेट झालीच नाही, अशी खंत ३५ वर्षे गोरक्षकर यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी रवी चाफे यांनी व्यक्त केली आहे.चाफे यांनी सांगितले की, ‘मी १९९३ पासून प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियममध्ये (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) रोजंदारीवर कामाला लागलो. तेव्हापासून गोरक्षकर यांचा माझा संबंध होता. नव्या व जुन्या मुलांना सोबत घेऊन ते काम करत होते. एखाद्या वेळी आमच्या हातून चूक झाली, तर कधीही त्यांनी मला चारचौघांत सुनावले नाही. एकट्याला बाजूला घेऊन ते माझी चूक निदर्शनास आणून देत होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना होता. तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला होता. त्यांनी प्रदर्शने भरविली. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असता देशातील विविध राज्यांत आणि परदेशांत जाण्याची संधी मला मिळाली.’ते पुढे म्हणाले, ‘प्रदर्शनात एखादी वस्तू मांडली असेल तर त्यावर प्रकाश नीट पडला आहे का? की त्यावर सावली पडली आहे का, याचे बारीक निरीक्षण ते करीत होते. त्यातले आम्हाला काही कळत नसताना आमच्याकडून ते पुन:पुन्हा खात्री करून घेत असत. वस्तूवर प्रकाश पडतो आहे का, याची विचारणा करीत. इतका मोठा माणूस आमच्या पातळीवर येऊन काम करीत होता. यातच मला व माझ्या सहकाऱ्यांना मोठेपणा वाटत होता. दरम्यान, त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांना मधूनमधून मी भेटत होतो. आजही त्यांच्या भेटीला निघालो होतो. कल्याणपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हा मला मोठा धक्का बसला. अखेर, त्यांची अखेरची भेट होऊ शकली नाही, याचे शल्य मला कायम राहणार आहे.’>पद्मश्री किताबाने गौरवगोरक्षकर यांच्या काळात म्युझियममध्ये लिफ्ट बसवली गेली. तसेच म्युझियमभोवती संरक्षक भिंत बांधली गेली. भारतातील गोष्टी व म्युझियम जगात नेण्याचे काम सरांनी केले. त्यात त्यांचे वेगळपण होते. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २००२ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविले होते. हा किताब मिळाल्यावर त्यांच्या वागण्याबोलण्यात व कामात कुठलाही फरक जाणवला नाही.>कुटुंबाचीमोठी हानीगोरक्षकर यांची भाची स्मिता गुप्ते यांनी सांगितले की, त्यांचे नाव खूप मोठे होते. आमच्या कुटुंबात त्यांना पद्मश्री मिळाली, हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्याकडून खूप लोक शिकले. सगळ्यांना त्यांनी ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्याची अपेक्षा कधीही केली नाही. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.