शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मोठ्या फटाक्यांनी शहराच्या कानांना बसले दडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:10 IST

राज्य सरकारच्या आवाहनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष ; काेराेनाचा धाेका असूनही केली प्रदूषणकारी आतषबाजी

धीरज परबलोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : राज्य सरकारने केवळ लहान फटाके लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडण्यास, तर मीरा-भाईंदर महापालिकेने केवळ दिवाळीमध्येच रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्याची परवानगी दिली असताना मीरा-भाईंदरमध्ये मात्र सरकार आणि पालिकेचे आदेश धुडकावून मोठे फटाके दिवसरात्र फोडण्यात येत आहेत. महापालिका, पोलीस आणि नगरसेवकही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण पर्यावरणासच नव्हे तर मानवी आरोग्याला गंभीर अपायकारक ठरत आहे. फटाक्यांचा आवाज आणि विषारी धुरामुळे आजारी रुग्णच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, श्वसन आदी विविध आजार असलेल्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जात असताना दिवाळीत फटाके फोडू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी केले होते. फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा गंभीर परिणाम कोरोना रुग्णांवर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. सार्वजनिकस्थळी फटाके फोडू नये, असे त्यांनी स्पष्ट करतानाच दिवाळीत केवळ रात्री ८ ते १० पर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी दिली होती.परंतु, शहरात मात्र सर्रास पालिका आणि सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन केले जात आहे. शांतता क्षेत्रेही फटाक्यांच्या आवाजाने गजबजून गेली आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतही फटाके फोडले जात आहेत.पालिकेने परवानगी दिल्याव्यतिरिक्त अन्य वेळांत फटाके फोडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता, तोही फुसका  ठरला. पोलीसही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. पोलिसांची वाहने काही भागात केवळ गस्त घालत असताना दिसत असली, तरी फटाके फोडणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई मात्र केली जात नव्हती. पोलीस ठाण्यातील दूरध्वनीही लागत नव्हता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने दिवाळी साजरी करावी, मोठे फटाके न फोडता केवळ लक्ष्मीपूजनाला लहान आवाजांचे फटाके फोडावेत, असे आवाहन सरकारने करूनही नागरिकांनी त्याकडे कानाडोळा करत मोठे फटाके फोडले. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना किंवा अन्य रुग्णांना त्रास होऊ शकतो, असे सांगितले होते. पण, आनंद साजरा करताना सामान्यांनी नियम धाब्यावर बसविले. वास्तविक यंत्रणांनी हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी होती, पण तसे झाले नाही. लक्ष्मीपूजनाला नेमकी विविध शहरांत काय वस्तुस्थिती होती, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा...

फटाक्यांचा आवाज आणि धूर हा लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असूनही प्रशासन आणि लोकसेवक जर याबाबत गंभीर नसतील, तर त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. रुग्ण, वृद्ध, लहान बाळ, आजारी लोकांवर या विषारी धूर व आवाजाचे गंभीर परिणाम होतात, याचे भान सर्वांनी राखले पाहिजे. मुळात पालिकेने फटाकेविक्रीलाच परवानगी दिली नाही पाहिजे.- सरिता नाईक, पदाधिकारी, सारथी फाउंडेशन

पहाटेपासून मध्यरात्रीनंतरही मोठ्या आवाजांचे फटाके फोडले जात होते. पोलिसांना व पालिकेला कळवूनही कारवाई केली जात नाही. फटाक्यांचा आवाज आणि धुरामुळे आजारीच नव्हे तर आमच्यासारख्या धडधाकट लोकांनाही जो त्रास होतो, तो सहन होण्यापलीकडचा झालेला आहे. पालिका, पोलीस आणि राजकारणी यांनी ठोस कारवाई केली तरच याला आळा बसेल.- सुरेश गोलानी, नागरिक