शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मराठी भाषेचा कणाच डळमळीत झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:16 IST

राज्यात मराठी भाषेसाठी आंदोलने होताना दिसतात; पण मराठी शाळा टिकावी म्हणून कोणताही नेता पुढे येत नाही.

ठाणे : राज्यात मराठी भाषेसाठी आंदोलने होताना दिसतात; पण मराठी शाळा टिकावी म्हणून कोणताही नेता पुढे येत नाही. आंदोलने करणाऱ्या नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जातात. मराठी शाळा हीच मराठी भाषेचा कणा आहे; मात्र, आज हा कणाच डळमळीत झाला असल्याची खंत प्रा.डॉ. वीणा सानेकर यांनी व्यक्त केली.छत्रपती शिक्षण मंडळाच्या मो.कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्त्री जीवन परिषद हॉल येथे ‘शालेय शिक्षण मायबोलीतूनच’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात डॉ. सानेकर बोलत होत्या. जे प्राध्यापक, शिक्षक, कलावंत, साहित्यिक मराठी भाषा टिकावी, यासाठी प्रयत्न करतात; पण त्यांची मुले मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसून येत आहे. जोवर महाराष्ट्रातील मराठी माणूस मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभा राहत नाही, तोवर मराठी शाळेचे चित्र बदलणार नाही. मराठी भाषा दिन आला की, मराठी भाषेचा अनेकांना पुळका येतो. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गाणे गायले जाते; पण त्या गाण्यातील ओळींप्रमाणे खरेच मराठी नांदते आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुलांना मराठी माध्यमात शिकवले तर काही नुकसान होत नाही. आता मराठी शाळांच्या अस्तित्वाचा लढा तीव्र करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.मराठी शाळांसमोरील आव्हाने व उपाय या विषयावर आपले मत मांडताना माजी मुख्याध्यापक अशोक टिळक म्हणाले की, मराठी शाळांसमोर सर्वात मोठे आवाहन हे आज विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्याचे आहे. घराघरांतून मातृभाषेतून शिक्षण असा आग्रह धरला पाहिजे, असे टिळक म्हणाले. परिसंवादात अमृता संभूस, राजेंद्र प्रधान यांनी विचार मांडले.