शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

तलाव सुशोभिकरण रखडले लालफितीत

By admin | Updated: September 26, 2015 22:53 IST

राज्य तलाव संवर्धन योजनेअंतर्गत शासनाच्या सुकाणू समितीच्या अधीन राहून ठाणे महापालिकेने सहा तलावांचा सुधारीत सविस्तर प्रकल्प अहवाल पुन्हा सादर केल्यानंतर त्यातील तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली

ठाणे : राज्य तलाव संवर्धन योजनेअंतर्गत शासनाच्या सुकाणू समितीच्या अधीन राहून ठाणे महापालिकेने सहा तलावांचा सुधारीत सविस्तर प्रकल्प अहवाल पुन्हा सादर केल्यानंतर त्यातील तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली. असली तरी त्याच्या अनुदानासाठी पालिकेला अद्यापही प्रतिक्षा करावी लागते. तर दुसरीकडे या तलावांच्या नियोजित सुशोभिकरणासंदर्भात पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने सल्लागार नेमण्याचे निश्चित केल्याने त्याबाबतच्या निविदा मागवण्याचे काम पालिकेने हाती घेतल्याचे काहीतरी कर ठाणेकर याअंतर्गत लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत उघड झाले आहे. अनुदान आणि सल्लागार मिळेपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांचे सुशोभिकरण लांबणीवर पडते की काय, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.ठाणे महापालिका हद्दीत पूर्वी ६५ तलाव होते. परंतु आता केवळ ३५ तलाव शिल्लक राहिले आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच तलाव सुस्थितीत असून उर्वरित तलावांची अवस्था दयनीय आहे. त्यांचे सुशोभिकरण करण्याऐवजी ज्या तलावांचे वारंवार सुशोभिकरण केले जाते, त्यावरच पुन्हा पालिका लाखोंची उधळपट्टी करीत आहे. विशेष म्हणजे आताही पालिकेने राज्य तलाव संवर्धन योजनेअंतर्ग ३५ तलावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल अनुदानासाठी शासनाला सादर केला होता. परंतु शासनाने प्राधान्याने कावेसार, तुर्फेपाडा, मासुंदा, जेलतलाव, नार आणि हरिओम नगर या ६ तलावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन देण्याचे आदेश दिल्याने पुन्हा तो तयार करण्यात आला. सुधारीत तलाव संवर्धन प्रकल्पास शासनाच्या सुकाणू समितीने फेबु्रवारी २०१५ मध्ये मान्यता दिली आहे. परंतु या कामांत होणारा खर्च अधिक असल्याचे सांगून अद्यापही पालिकेला अनुदान प्राप्त झालेले नाही. यासाठी १५ कोटी ११ लाख ३३ हजार ६६ रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. परंतु या सहापैकी केवळ कावेसार, तुर्फेपाडा आणि मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणासाठीच निधी देण्याचे पहिल्या टप्यात मान्य केले असले तरी तो ही अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, यामध्ये तलावांची साफसफाई, वृक्षारोपण, विसर्जन घाटाची दुरुस्ती आदीसह इतर महत्त्वाची कामे केली जाणार असून यासाठी त्याचे डिझायनींग, ड्रॉर्इंग तयार करण्यासाठी सल्लागार नेमणे आवश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाने स्पष्ट केल्यानुसार याबाबत सद्यस्थिती निविदा मागवल्या आहेत.या सर्व प्रक्रियेत बराच कालावधी जाणार असून या तलवांचे सुशोभिकरण कधी होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.