शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पाण्याच्या टाकीच्या शिडीचा भाग तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST

भिवंडी : तौक्ते चक्रीवादळामुळे भिवंडीत सोमवारी सकाळपासून जोरदार सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली होती. वादळवारा व पावसामुळे शहरात ...

भिवंडी : तौक्ते चक्रीवादळामुळे भिवंडीत सोमवारी सकाळपासून जोरदार सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली होती. वादळवारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याची, घरांच्या छतांचे पत्रे फुटल्याच्या घटना घडल्या. शहरातील पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या शिडीचा वरचा भाग तुटून पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही. मात्र या पाण्याच्या टाकीची सध्या दयनीय परिस्थिती झाल्याने मनपा प्रशासन या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात आय.जी.एम. रुग्णालयशेजारी पालिकेने सुमारे ४० वर्षांपूर्वी २० दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. या टाकीतून भिवंडी पूर्व विभागातील कार्यक्षेत्रात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असतो. या पाण्याच्या टाकीची निगा व दुरुस्ती न राखल्याने व वेळोवेळी तिची डागडुजी न केल्याने सध्या टाकीची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. टाकीच्या स्लॅब व खांबांना चिरा पडलेल्या असून, काही ठिकाणी स्लॅबचे प्लॅस्टरही निखळून पडले आहे. त्यातच सोमवारी या टाकीची काँक्रीट शिडीचा काही भाग तुटल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी आता तरी लवकरात लवकर या टाकीची दुरुस्ती मनपा प्रशासनाने करावी, अशी मागणी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.