शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: August 24, 2015 02:25 IST

रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे

भिवंडी : रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांबाबत मनपाच्या आरोग्य विभागास माहिती नसून शासनाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांनी गर्दी केली आहे.महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील कचरा नियमितरित्या उचलला जात नसल्याने तसेच कचरा उचलल्यानंतर तेथे जंतुनाशक औषधांची फवारणी न केल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचली आहेत. गटारे साफ न केल्याने सांडपाणी प्रवाहित होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा झाल्याने तेथे विषमज्वराचे प्रमाण वाढले आहे. याबाबत, मनपाच्या आरोग्य विभागाकडे माहिती नसल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांनी सांगितले. मात्र, स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात लोकमत प्रतिनिधीने डॉक्टरांकडून माहिती घेतली असता त्यांनी मलेरिया व विषमज्वराचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात बाह्यरुग्णांची संख्या दररोज सुमारे ८०० ते १००० असते. तर, मनपाच्या १५ आरोग्य केंद्रांत बाह्यरुग्णांची संख्या ३०० च्या आत असते. ही तफावत गेल्या काही वर्षांपासून कायम असून मनपा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून निष्क्रिय बनले आहेत.मनपाकडून उपचार मिळाले असते तर आम्ही रिक्षाचा खर्च करून इंदिरा गांधी रुग्णालयात आलो नसतो, असे रुग्णांनी सांगितले. याबाबत, मनपा आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. (प्रतिनिधी)