शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: August 24, 2015 02:25 IST

रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे

भिवंडी : रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांबाबत मनपाच्या आरोग्य विभागास माहिती नसून शासनाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांनी गर्दी केली आहे.महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील कचरा नियमितरित्या उचलला जात नसल्याने तसेच कचरा उचलल्यानंतर तेथे जंतुनाशक औषधांची फवारणी न केल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचली आहेत. गटारे साफ न केल्याने सांडपाणी प्रवाहित होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा झाल्याने तेथे विषमज्वराचे प्रमाण वाढले आहे. याबाबत, मनपाच्या आरोग्य विभागाकडे माहिती नसल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांनी सांगितले. मात्र, स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात लोकमत प्रतिनिधीने डॉक्टरांकडून माहिती घेतली असता त्यांनी मलेरिया व विषमज्वराचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात बाह्यरुग्णांची संख्या दररोज सुमारे ८०० ते १००० असते. तर, मनपाच्या १५ आरोग्य केंद्रांत बाह्यरुग्णांची संख्या ३०० च्या आत असते. ही तफावत गेल्या काही वर्षांपासून कायम असून मनपा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून निष्क्रिय बनले आहेत.मनपाकडून उपचार मिळाले असते तर आम्ही रिक्षाचा खर्च करून इंदिरा गांधी रुग्णालयात आलो नसतो, असे रुग्णांनी सांगितले. याबाबत, मनपा आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. (प्रतिनिधी)