शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: August 24, 2015 02:25 IST

रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे

भिवंडी : रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांबाबत मनपाच्या आरोग्य विभागास माहिती नसून शासनाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांनी गर्दी केली आहे.महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील कचरा नियमितरित्या उचलला जात नसल्याने तसेच कचरा उचलल्यानंतर तेथे जंतुनाशक औषधांची फवारणी न केल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचली आहेत. गटारे साफ न केल्याने सांडपाणी प्रवाहित होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा झाल्याने तेथे विषमज्वराचे प्रमाण वाढले आहे. याबाबत, मनपाच्या आरोग्य विभागाकडे माहिती नसल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांनी सांगितले. मात्र, स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात लोकमत प्रतिनिधीने डॉक्टरांकडून माहिती घेतली असता त्यांनी मलेरिया व विषमज्वराचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात बाह्यरुग्णांची संख्या दररोज सुमारे ८०० ते १००० असते. तर, मनपाच्या १५ आरोग्य केंद्रांत बाह्यरुग्णांची संख्या ३०० च्या आत असते. ही तफावत गेल्या काही वर्षांपासून कायम असून मनपा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून निष्क्रिय बनले आहेत.मनपाकडून उपचार मिळाले असते तर आम्ही रिक्षाचा खर्च करून इंदिरा गांधी रुग्णालयात आलो नसतो, असे रुग्णांनी सांगितले. याबाबत, मनपा आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. (प्रतिनिधी)