शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

येत्या काही दिवसात कोपरीला मिळणार वाढीव पाणीपुरवठा, तांत्रिक अडचणी होणार दूर

By अजित मांडके | Updated: September 6, 2022 15:39 IST

ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडूनअतिरिक्त २० द.ल.लि. पाण्याला मंजुरी मिळाली असून त्यापैकी ठाणे पूर्व कोपरी परिसरात सहा एमएलडी जादा पाणी मिळणार आहे.

ठाणे  :

ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडूनअतिरिक्त २० द.ल.लि. पाण्याला मंजुरी मिळाली असून त्यापैकी ठाणे पूर्व कोपरी परिसरात सहा एमएलडी जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे ठाणो पूर्व, कोपरी आणि आनंद नगर गांधीनगर परिसरातील पाणी चिंता दूर होणार आहे. मात्र मंजुरी मिळवून येथील वाढीव पाणी पुरवठा सुरु झाला नव्हता. यामध्ये जुन्या आणि नवीन जलवाहीन्यांची जोडणी करण्यात न आल्याने ही समस्या सुटु शकली नव्हती. मात्र आता हे कामही अंतिम टप्यात आल्याने येत्या दोन ते तीन दिवसात कोपरीला वाढीव आणि मुबलक पाणी पुरवठा होईल असा विश्वास महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

ठाणे पूर्व भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, चांगल्या नागरीसुविधा देण्याचे मोठे आव्हान ठाणो महापालिके समोर आहे. कोपरी विभागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिका क्षेत्नात एकूण ४८५ एमएलडी इतका पाणी पुरवठा होतो. यापैकी ठाणे पूर्व, कोपरी आणि आनंद नगर भागाला मिळून २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी, दुसरीकडे कोपरीतील काही भागात अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्र ारी वाढल्या होत्या. आनंद नगर, गांधी नगर केदारेश्वर नगर या भागात पाणी समस्या वाढली होती. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठाणो महापलिका प्रशासनाने मुंबई पालिकेकडे अतिरिक्त पाणी मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार सहा एमएलडी पाणी हे कोपरी विभागाला मिळाले आहे. मात्र हे वाढीव अद्यापही कोपरीकरांना मिळू शकलेले नाही.

मात्र आता ही समस्या येत्या दोन ते तीन दिवसात सुटणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. तो नेमका कशामुळे होत आहे, याची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यात जुन्या आणि नवीन जलवाहीन्या जोडणीची कामे अर्धवट असल्याचे निदर्शनास आले असून ती कामे आता पालिकेने हाती घेतली असून येत्या दोन ते तीन दिवसात ही कामे मार्गी लागून पाणी पुरवठा सुरळीत सुरु होईल असा दावा करण्यात आला आहे.

जुन्या आणि नवीन जलवाहीनी जोडणीची कामे करण्यात न आल्याने काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र आता ती अडचण दूर करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसात येथील मुबलक पाणी मिळण्यास सुरवात होईल.(विनोद पवार - उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा)

टॅग्स :thaneठाणे