शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

कोपरीचा रेल्वे उड्डाणपूल धोक्याचा?, दररोज ८ हजार वाहनांची येजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:49 IST

ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते.

डोंबिवली : ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे, असे पत्र मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय अधिकाºयांनी नुकतीच या पुलाची पाहणी केली. त्या वेळी त्यांना पुलाच्या खालच्या बाजूचे निघालेले प्लास्टर, गंज पकडलेल्या लोखंडी सळ्या दिसल्या. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुलाची तातडीने डागडुजी आवश्यक असून त्यासाठी विशेष ट्रॅफिकब्लॉक घेण्याची गरज आहे, असे अभियंत्यांनी या पत्रात म्हटले आहे. मात्र, ट्रॅफिकब्लॉक मिळत नसल्याने डागडुजी रखडल्याचे उघड झाले आहे.कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव १२ वर्षांपासून रखडला आहे. पूल कमकुवत होण्यामागे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. एमएमआरडीएने त्याची दखल घ्यावी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. या पुलाचे रुंदीकरण झाल्यास पुलावरील ताण कमी होईल. डागडुजीलाही वाव मिळेल. साहजिकच पुलाचे आयुष्यमान वाढेल. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या उंचीच्या तांत्रिक बाबीमुळे या पुलाचे नूतनीकरण रखडले होते. मात्र, रेल्वेने तो मुद्दा मार्गी लावल्याने पुलाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. पण, त्याच्या शुभारंभाबाबत अनिश्चितता आहे.कोपरी पूल धोकादायक बनल्याबाबत रेल्वेच्या अभियंत्यांनी वरिष्ठांकडे पत्र दिले आहे. पण, असे असले तरीही पुलाला फार धोका नाही. ज्या भागात प्लास्टर निघाले आहे आणि जेथे देखभालीची गरज आहे, ती कामे तातडीने केली जाणार आहेत. त्यासाठी लवकरच ट्रॅफिकब्लॉक घेतला जाईल.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे