शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

कोपरीचा रेल्वे उड्डाणपूल धोक्याचा?, दररोज ८ हजार वाहनांची येजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:49 IST

ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते.

डोंबिवली : ठाणे शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा कोपरी येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून दररोज आठ हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे, असे पत्र मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय अधिकाºयांनी नुकतीच या पुलाची पाहणी केली. त्या वेळी त्यांना पुलाच्या खालच्या बाजूचे निघालेले प्लास्टर, गंज पकडलेल्या लोखंडी सळ्या दिसल्या. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुलाची तातडीने डागडुजी आवश्यक असून त्यासाठी विशेष ट्रॅफिकब्लॉक घेण्याची गरज आहे, असे अभियंत्यांनी या पत्रात म्हटले आहे. मात्र, ट्रॅफिकब्लॉक मिळत नसल्याने डागडुजी रखडल्याचे उघड झाले आहे.कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव १२ वर्षांपासून रखडला आहे. पूल कमकुवत होण्यामागे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. एमएमआरडीएने त्याची दखल घ्यावी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. या पुलाचे रुंदीकरण झाल्यास पुलावरील ताण कमी होईल. डागडुजीलाही वाव मिळेल. साहजिकच पुलाचे आयुष्यमान वाढेल. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या उंचीच्या तांत्रिक बाबीमुळे या पुलाचे नूतनीकरण रखडले होते. मात्र, रेल्वेने तो मुद्दा मार्गी लावल्याने पुलाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. पण, त्याच्या शुभारंभाबाबत अनिश्चितता आहे.कोपरी पूल धोकादायक बनल्याबाबत रेल्वेच्या अभियंत्यांनी वरिष्ठांकडे पत्र दिले आहे. पण, असे असले तरीही पुलाला फार धोका नाही. ज्या भागात प्लास्टर निघाले आहे आणि जेथे देखभालीची गरज आहे, ती कामे तातडीने केली जाणार आहेत. त्यासाठी लवकरच ट्रॅफिकब्लॉक घेतला जाईल.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे