शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ: सहा हजार नव्या मतदारांची नोंदणी तर ३०० मतदारांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:25 IST

ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमाद्वारे सहा हजार नवयुवकांनी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदारयादीमध्ये नोंदणी केली आहे. तर गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची नावे मतदारयादीतून वगळल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी दिली.

ठळक मुद्देतीन लाख ५१ हजार ५०९ मतदारांचा समावेश४२ हजार ८४७ मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव साडे तीन हजार मतदारांनी केली नावातील दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नविन सहा हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. तर ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. या मतदारसंघामध्ये तीन लाख ५१ हजार ५०९ मतदार आहेत. यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसून मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी वागळे इस्टेट, रामनगर, आयटीआयच्या कार्यशाळा क्रमांक एक येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.३१ आॅगस्ट २०१९ रोजी नव्याने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीनुसार या मतदारसंघामध्ये एक लाख ९३ हजार ७४ पुरुष, एक लाख ५८ हजार २९१ महिला, १३४ सैनिक तर दहा इतर अशा तीन लाख ५१ हजार ५०९ मतदारांची संख्या आहे. त्यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्राचा अभाव आहे. सुमारे ८७ टक्के म्हणजे तीन लाख आठ हजार ८६२ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असल्याचा दावाही तामोरे यांनी केला. मतदारयादीमध्ये तीन लाख पाच हजार १३८ मतदारांचे छायाचित्र आहे. तर ४६ हजार २३७ म्हणजे १३ टक्के मतदारांचे छायाचित्र यादीमध्ये नाही.* एकूण ३७० मतदानकेंद्रवयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी ३७० पैेकी २५९ मतदानकेंद्र ही तळमजल्यावर आहे. उर्वरित १५ पहिल्या, सहा दुसऱ्या तर ९० केंद्र ही मंडपामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील ७८७ दिव्यांग मतदारांपैकी ७६६ मतदारांना तळमजल्यावर तर १७ मतदारांना पहिल्या आणि अवघ्या चार मतदारांना दुसºया मजल्यावर मतदानाची सुविधा केली आहे.........................तीन हजार ५०० मतदारांच्या नावात दुरुस्तीअलिकडेच १५ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारयादीसाठी विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी सुमारे तीन हजार ५०० मतदारांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरुन नावात दुरुस्ती केली. गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. तर सहा हजार नवयुवकांनी मतदार यादीमध्ये मतदानाचा हक्क बजविण्यासाठी नोंदणी केल्याचे तामोरे यांनी सांगितले..........................दोन हजार २२० कर्मचाऱ्यांची नियुक्तीया मतदारसंघात ३७० मतदानकेंद्र असून त्याठिकाणी निवडणूकीच्या कार्यक्रमासाठी मतदानकेंद्र अधिकारी कर्मचारी, शिपाई आणि पोलीस कर्मचारी असे दोन हजार २२० कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत..........................आयटीआयमध्ये मतमोजणीरामनगर येथील आयटीआयच्या कार्यशाळेमध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून त्याठिकाणी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, मतमोजणी आणि इव्हीएमच्या स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आली आहे.....................गडकरी रंगायतनमध्ये होणार प्रशिक्षणमतदान अधिकारी यांच्यासाठी २७ सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे पहिले तर ११ आणि १२ आॅक्टोंबर रोजी दुसरे प्रशिक्षण आयटीआय वागळे इस्टेट येथे होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगkopri-pachpakhadi-acकोपरी पाचपाखडी