शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसह तरुणाईंच्या विकासात कोकण नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : राज्य शासनाच्या अपेक्षेस अनुसरून लॉकडाऊन काळात कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांनी विद्यार्थी, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कामे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : राज्य शासनाच्या अपेक्षेस अनुसरून लॉकडाऊन काळात कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांनी विद्यार्थी, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कामे, प्रसूतीच्या काळात घरी राहिलेल्या महिलांची मजुरी बुडाल्यामुळे ती भरून देण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण कामांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य शासनास अपेक्षित असलेल्या कामांचा नावीन्यपूर्ण कामांमध्ये फारसा समावेश नसल्यामुळे कोकणातील सर्व जिल्हे कोकण विभागीय जिल्हा नियोजन आढावा बैठकीत जवळजवळ नापास झाल्याचे उघड झाले.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात कोकण विभागीय जिल्हा नियोजन व कोरोना उपाययोजनांवरील खर्चाचा आढावा क्षीरसागर यांनी यावेळी घेतला. त्यात नावीन्यपूर्ण कामांचा निधी शासन निर्णयास अनुसरून खर्च करण्याची गरज असल्याचे सांगितले. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काढून ठेवण्यात येणारा निधी वेळेवर खर्च होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या आढावा बैठकीला ठाणेसह मुंबई शहर, उपनगर या जिल्ह्यांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मात्र पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला अनुपस्थित राहिले. तेथील निवडणुकीच्या कामास प्राधान्य देऊन त्यांनी क्षीरसागर यांची परवानगी घेऊन बैठकीला गैरहजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या कामाचा जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण कामांसह कोरोनावरील उपाययोजनांच्या खर्चाचा आढावा मात्र यावेळी घेता आला नाही.

यावेळी मानव विकासमध्ये आणि खास करून नावीन्यपूर्ण कामांच्या झाडाझडतीनंतर आरोग्यतपासणी, अनुसूचित जाती-जमातीस उपयुक्त ठरणारी कामे, प्रसूत महिलांना बुडीत मजुरी देणे, एमपीएससी, यूपीएससीसह स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका सुरू करणे, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वाहतुकीची व्यवस्था राज्यभर करण्याचे शासन धोरण आहे, असे क्षीरसागर यांनी सभागृहातील जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना ऐकवले आणि त्यास अनुसरून कोकणात कुठेच फारसे कमी कामे नावीन्यपूर्ण कामात घेतले नसल्याची नाराजी क्षीरसागर यांनी या बैठकीत व्यक्त केली. शासनाच्या नियमास अनुसरून व अपेक्षेनुसार मालमत्तेसह लोकोपयोगी कामे घेण्यावर भर देण्याचे मार्गदर्शन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी केले.

.......