शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसह तरुणाईंच्या विकासात कोकण नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : राज्य शासनाच्या अपेक्षेस अनुसरून लॉकडाऊन काळात कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांनी विद्यार्थी, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कामे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : राज्य शासनाच्या अपेक्षेस अनुसरून लॉकडाऊन काळात कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांनी विद्यार्थी, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कामे, प्रसूतीच्या काळात घरी राहिलेल्या महिलांची मजुरी बुडाल्यामुळे ती भरून देण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण कामांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य शासनास अपेक्षित असलेल्या कामांचा नावीन्यपूर्ण कामांमध्ये फारसा समावेश नसल्यामुळे कोकणातील सर्व जिल्हे कोकण विभागीय जिल्हा नियोजन आढावा बैठकीत जवळजवळ नापास झाल्याचे उघड झाले.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात कोकण विभागीय जिल्हा नियोजन व कोरोना उपाययोजनांवरील खर्चाचा आढावा क्षीरसागर यांनी यावेळी घेतला. त्यात नावीन्यपूर्ण कामांचा निधी शासन निर्णयास अनुसरून खर्च करण्याची गरज असल्याचे सांगितले. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काढून ठेवण्यात येणारा निधी वेळेवर खर्च होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या आढावा बैठकीला ठाणेसह मुंबई शहर, उपनगर या जिल्ह्यांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मात्र पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला अनुपस्थित राहिले. तेथील निवडणुकीच्या कामास प्राधान्य देऊन त्यांनी क्षीरसागर यांची परवानगी घेऊन बैठकीला गैरहजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या कामाचा जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण कामांसह कोरोनावरील उपाययोजनांच्या खर्चाचा आढावा मात्र यावेळी घेता आला नाही.

यावेळी मानव विकासमध्ये आणि खास करून नावीन्यपूर्ण कामांच्या झाडाझडतीनंतर आरोग्यतपासणी, अनुसूचित जाती-जमातीस उपयुक्त ठरणारी कामे, प्रसूत महिलांना बुडीत मजुरी देणे, एमपीएससी, यूपीएससीसह स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका सुरू करणे, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वाहतुकीची व्यवस्था राज्यभर करण्याचे शासन धोरण आहे, असे क्षीरसागर यांनी सभागृहातील जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना ऐकवले आणि त्यास अनुसरून कोकणात कुठेच फारसे कमी कामे नावीन्यपूर्ण कामात घेतले नसल्याची नाराजी क्षीरसागर यांनी या बैठकीत व्यक्त केली. शासनाच्या नियमास अनुसरून व अपेक्षेनुसार मालमत्तेसह लोकोपयोगी कामे घेण्यावर भर देण्याचे मार्गदर्शन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी केले.

.......