शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसह तरुणाईंच्या विकासात कोकण नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : राज्य शासनाच्या अपेक्षेस अनुसरून लॉकडाऊन काळात कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांनी विद्यार्थी, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कामे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : राज्य शासनाच्या अपेक्षेस अनुसरून लॉकडाऊन काळात कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांनी विद्यार्थी, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कामे, प्रसूतीच्या काळात घरी राहिलेल्या महिलांची मजुरी बुडाल्यामुळे ती भरून देण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण कामांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य शासनास अपेक्षित असलेल्या कामांचा नावीन्यपूर्ण कामांमध्ये फारसा समावेश नसल्यामुळे कोकणातील सर्व जिल्हे कोकण विभागीय जिल्हा नियोजन आढावा बैठकीत जवळजवळ नापास झाल्याचे उघड झाले.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात कोकण विभागीय जिल्हा नियोजन व कोरोना उपाययोजनांवरील खर्चाचा आढावा क्षीरसागर यांनी यावेळी घेतला. त्यात नावीन्यपूर्ण कामांचा निधी शासन निर्णयास अनुसरून खर्च करण्याची गरज असल्याचे सांगितले. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काढून ठेवण्यात येणारा निधी वेळेवर खर्च होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या आढावा बैठकीला ठाणेसह मुंबई शहर, उपनगर या जिल्ह्यांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मात्र पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला अनुपस्थित राहिले. तेथील निवडणुकीच्या कामास प्राधान्य देऊन त्यांनी क्षीरसागर यांची परवानगी घेऊन बैठकीला गैरहजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या कामाचा जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण कामांसह कोरोनावरील उपाययोजनांच्या खर्चाचा आढावा मात्र यावेळी घेता आला नाही.

यावेळी मानव विकासमध्ये आणि खास करून नावीन्यपूर्ण कामांच्या झाडाझडतीनंतर आरोग्यतपासणी, अनुसूचित जाती-जमातीस उपयुक्त ठरणारी कामे, प्रसूत महिलांना बुडीत मजुरी देणे, एमपीएससी, यूपीएससीसह स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका सुरू करणे, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वाहतुकीची व्यवस्था राज्यभर करण्याचे शासन धोरण आहे, असे क्षीरसागर यांनी सभागृहातील जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना ऐकवले आणि त्यास अनुसरून कोकणात कुठेच फारसे कमी कामे नावीन्यपूर्ण कामात घेतले नसल्याची नाराजी क्षीरसागर यांनी या बैठकीत व्यक्त केली. शासनाच्या नियमास अनुसरून व अपेक्षेनुसार मालमत्तेसह लोकोपयोगी कामे घेण्यावर भर देण्याचे मार्गदर्शन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी केले.

.......