शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अपंग शिक्षिकेचा ज्ञानदानाचा वसा; व्यंगावर मात करत जिद्दीने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:40 IST

प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत.

- हुसेन मेमनजव्हार: असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कºहे येथील प्रतिभा हिलीम या अपंग शिक्षिकेची आहे. जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षिकेची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत. त्यांचे मूळ गाव विक्र मगड तालुक्यातील कºहे असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत याची जाणीव ठेवून त्या आपल्या गावी आल्या. त्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद झाल्या. शाळा सुरू करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले. शाळा सुरू झाल्याच तरी सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण झाले. सरकारने शाळा ‘आॅनलाईन’ सुरू करायला परवानगी दिली. अनेक शाळांनी आॅनलाईन उपक्रम सुरू देखील केले. परंतु ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अ‍ॅण्ड्राइड मोबाइल नसणे यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.ही बाब त्यांच्या लक्षात आली. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली. आपल्या अपंगावर यशस्वीपणे मात करत जे विद्यार्थी आज आॅनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत.इयत्ता पहिली ते सातवीपर्र्यंतच्या साधारणपणे २५ विद्यार्थ्यांना त्या शिकविण्याचे काम करतात. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांचे हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरच सर्वाना प्रेरणा देणारे आहे.कोरोना महामारीच्या काळात सरकारने शाळा ‘आॅनलाइन’ सुरू करायला परवानगी दिली. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अँड्राइड मोबाइल नसणे, यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब माझ्या लक्षात आली आणि मग या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू करण्यात आले.- प्रतिभा हिलीम, प्राथमिक शिक्षिका