शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

अपंग शिक्षिकेचा ज्ञानदानाचा वसा; व्यंगावर मात करत जिद्दीने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:40 IST

प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत.

- हुसेन मेमनजव्हार: असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कºहे येथील प्रतिभा हिलीम या अपंग शिक्षिकेची आहे. जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षिकेची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत. त्यांचे मूळ गाव विक्र मगड तालुक्यातील कºहे असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत याची जाणीव ठेवून त्या आपल्या गावी आल्या. त्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद झाल्या. शाळा सुरू करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले. शाळा सुरू झाल्याच तरी सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण झाले. सरकारने शाळा ‘आॅनलाईन’ सुरू करायला परवानगी दिली. अनेक शाळांनी आॅनलाईन उपक्रम सुरू देखील केले. परंतु ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अ‍ॅण्ड्राइड मोबाइल नसणे यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.ही बाब त्यांच्या लक्षात आली. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली. आपल्या अपंगावर यशस्वीपणे मात करत जे विद्यार्थी आज आॅनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत.इयत्ता पहिली ते सातवीपर्र्यंतच्या साधारणपणे २५ विद्यार्थ्यांना त्या शिकविण्याचे काम करतात. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांचे हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरच सर्वाना प्रेरणा देणारे आहे.कोरोना महामारीच्या काळात सरकारने शाळा ‘आॅनलाइन’ सुरू करायला परवानगी दिली. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अँड्राइड मोबाइल नसणे, यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब माझ्या लक्षात आली आणि मग या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू करण्यात आले.- प्रतिभा हिलीम, प्राथमिक शिक्षिका