शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फळांचा राजा महागला, भाज्या आहेत स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

ठाणे : उन्हाळा सुरू झाला की चाहूल लागते ती मधुर केशरी आंब्याची. सध्या या आंब्याचे भाव चढे आहेत. फळांमध्ये ...

ठाणे : उन्हाळा सुरू झाला की चाहूल लागते ती मधुर केशरी आंब्याची. सध्या या आंब्याचे भाव चढे आहेत. फळांमध्ये आंबा महाग असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे, गवार, काकडी सोडले तर इतर भाज्या मात्र स्वस्त आहेत. किराणाच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डाळी, कडधान्य यांसह तेलाचे भाव चढेच आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून तेलाचे भाव वाढलेले आहेत. तेलाचे भाव खाली येत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आता तेल १० रुपयांनी महागले आहे. तेलाचे दर महागल्यामुळे इतर तेलयुक्त पदार्थांमध्येही वाढ दिसून येत आहे. तेलापाठोपाठ तूरडाळ, मूगडाळ, मसूर तसेच साखर, तर कडधान्यांमध्ये मटकी, चवळी, काबोली चणेही महागले आहेत. डाळी तर प्रत्येक किलोमागे दहा रुपयांनी तर कडधान्ये चक्क २० ते ३० रुपये प्रतिकिलोने महागली, तर शेंगदाणेही १५ रुपये प्रतिकिलोने महागले असल्याचे किराणा व्यापारी सचिन पाचंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा सध्या १२०० रुपये डझन आहे. त्यामुळे अद्याप ग्राहकांची फारशी मागणी नसल्याचे फळविक्रेते दिनेश पाटील यांनी सांगितले. त्यापाठोपाठ पेर महाग आहे तर फळांमध्ये दुसरीकडे द्राक्ष आणि कलिंगडचे दर कमी आहेत, असे त्यांनी सांगितले. काकडी, गवारचे दर दुपटीने वाढले आहेत. फ्लाॅवर, कोबी दुसरीकडे स्वस्त आहेत. टोमॅटो सर्वाधिक स्वस्त आहे. फरसबी, वाटाण्याचे भाव सर्वसाधारण असल्याचे भाजीविक्रेते उमेश जयस्वाल यांनी सांगितले. किराणा मालामधील भाववाढीमुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाज्या एकीकडे स्वस्त असल्या तरी किराणा महाग असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

------------------------------------------------

किराणामध्ये स्वस्त काहीच झालेले नाही. मैदा, पोहे, रवा यांचे भाव आधीपासून वाढलेले असून ते आताही चढेच राहिले आहेत.

- सचिन पाचंगे, किराणा व्यापारी

द्राक्ष सध्या खूप स्वस्त आहेत. मालाला उठाव नसल्याने कमी दरात द्राक्ष विकली जात आहेत. आंबा सर्वांत महाग असल्याने सध्या फार ग्राहक ते घेत नाहीत.

- दिनेश पाटील, फळविक्रेता

उन्हाळ्यात भाज्यांची आवक भरपूर असते. त्यामुळे सध्या भाज्यांचे भाव सर्वसाधारण आहेत. फक्त एक-दोन भाज्या महाग आहेत.

- उमेश जयस्वाल, भाजीविक्रेता

-----------------------------------------------------------------

डाळी, कडधान्याची भाववाढ

तूरडाळ १०४-१०५ रुपये किलोवरून ११५ रुपये प्रतिकिलो, मूगडाळ ९८-१०० रुपये किलोवरून ११५ रुपये किलो, मसूरडाळ ८० रुपये किलोवरून ९० रुपये किलो, साखर ३४ रुपये किलोवरून ३९ रुपये किलो, तेल ११८ ते १३४ वरून १२८ ते १५८ प्रतिलीटर, बारीक मटकी ९० ते ९५ रुपये किलोवरून १२० रुपये किलो, बारीक चवळी १८० रुपये किलोवरून २१० रुपये किलो तर काबोली चणा ७५ ते ८० रुपये किलोवरून ११० रुपयांनी मिळत आहे.

आंबा महागला

आंबा १००० ते १२०० रु. डझन, पेर १५० ते १६० रुपयांवरून २०० ते २२० रु. किलो, द्राक्ष ७० ते ८० रु. किलोवरून ५० ते ६० रु. किलो, तर कलिंगड ३० रुपयांनी मिळत आहे. आंबा महागल्याने खवय्यांची पंचायत झाली आहे.

भाजीचे भाव

काकडी २० ते २२ रुपयांवरून ४० रुपये किलो, गवार ८० रुपये किलो, फ्लाॅवर, कोबी २० ते ३० रुपये किलो, वाटाणा ४० रुपये किलो, फरसबी ५० ते ६० रुपये, तर टोमॅटो ३० रुपयांना अडीच किलो मिळत आहेत.

----------------------------------------------------------------------