शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

मुलांना लवकरच मिळणार बोटिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, तिन्ही वास्तूंचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मंगळवारी दिली. गेल्या आठवड्यात तिन्ही वास्तूंची पाहणी स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह नाईकवाडे यांनी केली.

शहरातील वालधुनी नदी किनारी १९९० दरम्यान साडेतीन एकर जागेवर महापालिकेने कॅम्प नं-३ येथील हिराघाट येथे बोटक्लब सुरू केले होते. या ठिकाणी बोटिंगसह सुंदर बाग, मंदिर, भिंतीवर संत, महापुरुष यांचे चित्रे साकारण्यात आली. हिराघाट बोटक्लबमध्ये शेजारील शहरातील नागरिक मुलांना घेऊन विरंगुळ्यासाठी येत होती. कालांतराने बोटक्लब बंद पडले. मात्र अद्याप बोट क्लबचे अवशेष कायम आहेत. बोटक्लबसह गोलमैदानचा काही भाग व इंदिरा गांधी भाजी मंडईचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपयुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी आदींनी घेतला. गेल्या आठवड्यात नाईकवाडे यांच्यासह टोनी सिरवानी यांनी पाहणी केली.

हिराघाट बोटक्लब, गोलमैदान व इंदिरा भाजी मार्केटच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार नेमल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली. तिन्ही जागांना राज्य शासनाने सनद दिली असून महापालिकेकडे तिन्ही जागा हस्तांतरित केल्यावर विकासासाठी अडसर येणार नसल्याचे उपयुक्तांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालय इमारत, गोलमैदान, हिराघाट, इंदिरा गांधी भाजी मंडई, आयडीआय कंपनीजवळील कब्रस्तान जागा, व्हीटीसी ग्राऊंड अशा ११ जागांला शासनाने सनद दिली असून गार्डन, उद्यान, महापालिकेची विविध कार्यालये अशा १२० पेक्षा जास्त जागांला सनद देण्याची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली असून सर्वांना सनद मिळण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले. एकूणच सर्वच महापालिका मालमत्तांना सनद मिळाल्यावर त्यांचा विकास करता येणार असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले.

...............

महापालिकेच्या मालमत्तांना संरक्षण भिंत?

महापालिकेचे अनेक उद्यान, ग्राऊंड, समाजमंदिर, शाळा, पालिका विविध कार्यालय, खुल्या जागा भग्नावस्थेत पडल्या आहेत. तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून सल्लागार समिती नेमून त्यांना संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.

........................