शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

मुलांना लवकरच मिळणार बोटिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, तिन्ही वास्तूंचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मंगळवारी दिली. गेल्या आठवड्यात तिन्ही वास्तूंची पाहणी स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह नाईकवाडे यांनी केली.

शहरातील वालधुनी नदी किनारी १९९० दरम्यान साडेतीन एकर जागेवर महापालिकेने कॅम्प नं-३ येथील हिराघाट येथे बोटक्लब सुरू केले होते. या ठिकाणी बोटिंगसह सुंदर बाग, मंदिर, भिंतीवर संत, महापुरुष यांचे चित्रे साकारण्यात आली. हिराघाट बोटक्लबमध्ये शेजारील शहरातील नागरिक मुलांना घेऊन विरंगुळ्यासाठी येत होती. कालांतराने बोटक्लब बंद पडले. मात्र अद्याप बोट क्लबचे अवशेष कायम आहेत. बोटक्लबसह गोलमैदानचा काही भाग व इंदिरा गांधी भाजी मंडईचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपयुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी आदींनी घेतला. गेल्या आठवड्यात नाईकवाडे यांच्यासह टोनी सिरवानी यांनी पाहणी केली.

हिराघाट बोटक्लब, गोलमैदान व इंदिरा भाजी मार्केटच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार नेमल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली. तिन्ही जागांना राज्य शासनाने सनद दिली असून महापालिकेकडे तिन्ही जागा हस्तांतरित केल्यावर विकासासाठी अडसर येणार नसल्याचे उपयुक्तांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालय इमारत, गोलमैदान, हिराघाट, इंदिरा गांधी भाजी मंडई, आयडीआय कंपनीजवळील कब्रस्तान जागा, व्हीटीसी ग्राऊंड अशा ११ जागांला शासनाने सनद दिली असून गार्डन, उद्यान, महापालिकेची विविध कार्यालये अशा १२० पेक्षा जास्त जागांला सनद देण्याची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली असून सर्वांना सनद मिळण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले. एकूणच सर्वच महापालिका मालमत्तांना सनद मिळाल्यावर त्यांचा विकास करता येणार असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले.

...............

महापालिकेच्या मालमत्तांना संरक्षण भिंत?

महापालिकेचे अनेक उद्यान, ग्राऊंड, समाजमंदिर, शाळा, पालिका विविध कार्यालय, खुल्या जागा भग्नावस्थेत पडल्या आहेत. तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून सल्लागार समिती नेमून त्यांना संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.

........................