शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

मुलांना लवकरच मिळणार बोटिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, तिन्ही वास्तूंचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मंगळवारी दिली. गेल्या आठवड्यात तिन्ही वास्तूंची पाहणी स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह नाईकवाडे यांनी केली.

शहरातील वालधुनी नदी किनारी १९९० दरम्यान साडेतीन एकर जागेवर महापालिकेने कॅम्प नं-३ येथील हिराघाट येथे बोटक्लब सुरू केले होते. या ठिकाणी बोटिंगसह सुंदर बाग, मंदिर, भिंतीवर संत, महापुरुष यांचे चित्रे साकारण्यात आली. हिराघाट बोटक्लबमध्ये शेजारील शहरातील नागरिक मुलांना घेऊन विरंगुळ्यासाठी येत होती. कालांतराने बोटक्लब बंद पडले. मात्र अद्याप बोट क्लबचे अवशेष कायम आहेत. बोटक्लबसह गोलमैदानचा काही भाग व इंदिरा गांधी भाजी मंडईचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपयुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी आदींनी घेतला. गेल्या आठवड्यात नाईकवाडे यांच्यासह टोनी सिरवानी यांनी पाहणी केली.

हिराघाट बोटक्लब, गोलमैदान व इंदिरा भाजी मार्केटच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार नेमल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली. तिन्ही जागांना राज्य शासनाने सनद दिली असून महापालिकेकडे तिन्ही जागा हस्तांतरित केल्यावर विकासासाठी अडसर येणार नसल्याचे उपयुक्तांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालय इमारत, गोलमैदान, हिराघाट, इंदिरा गांधी भाजी मंडई, आयडीआय कंपनीजवळील कब्रस्तान जागा, व्हीटीसी ग्राऊंड अशा ११ जागांला शासनाने सनद दिली असून गार्डन, उद्यान, महापालिकेची विविध कार्यालये अशा १२० पेक्षा जास्त जागांला सनद देण्याची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली असून सर्वांना सनद मिळण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले. एकूणच सर्वच महापालिका मालमत्तांना सनद मिळाल्यावर त्यांचा विकास करता येणार असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले.

...............

महापालिकेच्या मालमत्तांना संरक्षण भिंत?

महापालिकेचे अनेक उद्यान, ग्राऊंड, समाजमंदिर, शाळा, पालिका विविध कार्यालय, खुल्या जागा भग्नावस्थेत पडल्या आहेत. तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून सल्लागार समिती नेमून त्यांना संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.

........................