शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

खंबाळपाडा मार्गाची खड्ड्यांनी झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम ...

कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या खंबाळपाडा मार्गावरही हेच चित्र असून, या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. २०१७च्या पावसाळ्यात या मार्गावर सुरू असलेल्या गटाराच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांत पडून एका व्यापाराचा मृत्यू झाला होता. सध्याचे खड्डे पाहता आणखीन बळी गेल्यानंतर संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टाटानाका ते घरडा सर्कल हा खंबाळपाडा मार्ग केडीएमसीच्या हद्दीत येत असला तरी या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला केमिकल कंपन्या तसेच बेकायदा थाटलेली मार्बलची दुकाने आहेत. या रस्त्यावर प्रदूषित पाण्याच्या प्रवाहाबरोबरच भोवताली पडलेल्या डेब्रिजच्या कचऱ्याने या मार्गाला एकप्रकारे अवकळा आली आहे. जलवाहिनीवर झालेली बेकायदा बांधकामे, याेग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी या मार्गावरील विकासनाका येथे तीन ते चार फुटांपर्यंत साचत होते. तेथे रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. त्याला लागून असलेल्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मध्यंतरी या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र, पावसाळा सुरू हाेताच पडलेल्या खड्ड्यांनी या कामाचा दर्जा दाखवून दिला आहे. विकासनाका, भोईरवाडी, सावित्रीबाई फुले कला मंदिरनजीकचा चौक या महत्त्वाच्या ठिकाणांसह या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. माेठमाेठे खड्डे असल्याने या मार्गावरून वाहन चालविणे चालकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

--------------------------------

खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करू

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. ते काम निकृष्ट झाल्याचे आता पडलेल्या खड्ड्यांनी उघड केले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांतून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊनच तेथून मार्गस्थ व्हावे लागते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. वेळीच हे खड्डे न बुजवल्यास यंत्रणेच्या निषेधार्थ खड्ड्यांत साठलेल्या पाण्याने आंघोळ करू, असे मत रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.