शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘केशवसीता’ करणार प्लास्टिकमुक्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण -  कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.पालिका हद्दीतून ६५० मेट्रीक टन घनकचरा दररोज गोळा केला जातो. त्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. जैव कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी १३ ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी आयरे गाव व उंबर्डे येथे १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प केला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्याठिकाणी प्रत्येकी १० टन याप्रमाणे २० टन जैविक कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. महापालिका हद्दीतून जमा होणाºया एकूण घनकचºयापैकी ४९ टक्के कचरा हा सुका कचरा आहे. त्यापैकी ४५ टक्के म्हणजे ३०० मे.ट. कचरा हा प्लास्टिकचा आहे. त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे रॅपर, प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू यांचा समावेश आहे. सध्या महापालिका हद्दीत डोंबिवलीतील ऊर्जा फाउंडेशन प्लास्टिक कचरा गोळा करते. महिनाभरात गोळा केलेला प्लास्टिक कचरा हा प्रक्रियेसाठी जेजुरी येथील रुद्र फाउंडेशनकडे पाठवला जातो. त्याच्या वाहतुकीवर जास्त खर्च होतो. ऊर्जा फाउंडेशन ठाणे व डोंबिवलीतून जवळपास २२ टन प्लास्टिक कचरा गोळा करते. पुण्याच्या केशवसीतातर्फे सिंहगड, रायगड, बाणेश्वर, बारामती, भीमाशंकर याठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करून तो कचरा रुद्र फाउंडेशनकडे प्रक्रियेसाठी पाठवला जातो. प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून जे इंधन तयार होते, ते स्टोव्ह, बॉयलर्स, शेतीपंप, फर्नेस इत्यादीसाठी उपयुक्त आहे. केशवसीता ट्रस्टला काही अटीशर्तीवर प्रकल्प सुरू करण्यास दिला जाऊ शकतो. प्रकल्प उभारण्यासाठी केशवसीताला ४०० चौरस मीटर इतकी मोकळी जागा हवी आहे. तसेच विजेचा पुरवठा आवश्यक आहे. हा प्रकल्प संस्थेला १० वर्षे नाममात्र भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाईल. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संस्थेची असेल. तसेच पर्यावरण खात्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी संस्थेचीच राहील. प्रकल्प एक महिन्यापेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास संस्थेला हा प्रकल्प महापालिकेस विनाअट हस्तांतरित करावा लागेल. प्रकल्पासाठी अनामत रक्कम एक लाख रुपये भरावी लागेल. दिवसाला ३०० किलो प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून इंधन तयार केले जाणार आहे. बारावे येथे बायोगॅस प्रकल्पास लागून असलेल्या जागाही एक रुपये प्रतिचौरस फूट या दराने देण्याचा पालिकेचा विचार आहे.उंबर्डे व बारावे येथे कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यावरणाच्या ना हरकत दाखल्यासाठी जनसुनावणीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सरकारला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी हरित लवादाकडे १६ जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प अस्तित्वात आला, तर ६५० मेट्रीक टन कचºयापैकी ४५ टक्के प्लास्टिक कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचणार आहे. ६५० मेट्रीक टन कचºयातून ३०० मेट्रीक टन प्लास्टिक कचºयावरील प्रक्रिया सुरू होऊ शकते.१३ ठिकाणी प्रत्येकी १० टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प असल्याने १३० मेट्रीक टन जैव कचरा बायोगॅस प्रकल्पात जाऊ शकतो. दोन्ही प्रकल्पात ४३० मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया होऊ शकते. उरलेल्या २२० मेट्रीक टन कचºयापासून खत तयार करण्याचे महापालिकेकडून प्रस्तावित आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका