शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी आयुक्तांवरील कारवाईचे गंडांतर टळणार

By admin | Updated: June 3, 2016 01:55 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३१ मे अखेरपर्यंत ७५० घरांत शौचालये बांधण्यात आली असून साडेचारशे शौचालयांचे काम प्रगतीपथावर

कल्याण : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३१ मे अखेरपर्यंत ७५० घरांत शौचालये बांधण्यात आली असून साडेचारशे शौचालयांचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा मलनि:सारण विभागाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणी नगरविकास खात्याकडून आयुक्तांवर असलेली कारवाईची टांगती तलवार दूर होण्याची चिन्हे आहेत.अनुदान घेतल्यानंतरही शौचालयाचे काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून ती रक्कम माघारी घेतली जाणार आहे. ती न दिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून चार, राज्य सरकारकडून ८ तसेच महापालिकेतर्फे १६ असे २८ हजारांचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी दिले जात आहे. केडीएमसीच्या सर्वेक्षणात तीन हजार १६४ घरांत शौचालय नसल्याचे आढळून आले. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार केलेल्या छाननीत एक हजार ८३१ लाभार्थी निश्चित करण्यात आले. शौचालये बांधण्याचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयुक्त ई. रवींद्रन यांनी ठेवले होते. त्यातील ७५० शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. साडेचारशे शौचालयांचे काम सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात आहे.