शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केडीएमटीचे आता ‘मनसे’ खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:38 IST

एकीकडे केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असताना दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या मनसेनेदेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु, परिवहनमधील कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून पार पाडली जात नाही, तोवर खाजगीकरण होऊ देणार नाही

कल्याण - एकीकडे केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असताना दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या मनसेनेदेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु, परिवहनमधील कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून पार पाडली जात नाही, तोवर खाजगीकरण होऊ देणार नाही, असा पवित्रा येथील कर्मचाºयांच्या संघटनांनी घेतला आहे. लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन अंतिम भूमिका मांडली जाईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.गेल्या सोमवारी केडीएमसीचा अर्थसंकल्प महासभेला सादर करण्यात आला. स्थायी सभापती राहुल दामले यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात परिवहनच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. केडीएमटीची स्थापना होऊन अनेक वर्षे उलटली. पण, अद्यापही हा उपक्रम सक्षम होऊ शकलेला नाही. उपक्रमाला ऊर्जितावस्था यावी म्हणून अनेकदा प्रयत्न झाले. परंतु, उपक्रमाच्या कारभारात काहीही सुधारणा झाली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. केडीएमटी कर्मचारी महापालिका सेवेत सामावून घेऊन या उपक्रमाचे खाजगीकरण करण्याची वेळ येऊन ठेपल्याचा मुद्दा अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. तत्पूर्वी काही महिन्यांपूर्वी महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही किमान १०० बसेस रस्त्यावर धावल्या नाहीत, तर खाजगीकरणाचा विचार करावा लागेल, असा इशारा केडीएमटी प्रशासन आणि कर्मचारी यांना दिला होता. सत्ताधाºयांचा कल खाजगीकरणाकडे असताना विरोधीपक्ष मनसेनेही याला पाठिंबा दिला आहे. मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त गोविंद बोडके, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मनसेचे गटनेते प्रकाश भोईर आणि स्थायी समिती सभापती राहुल दामले यांच्याकडे पत्रव्यवहार करून केडीएमटी खाजगीकरणाबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. प्रारंभीच्या काळात परिवहनसेवा फायद्यात होती. मात्र, २६ जुलै २००५ ला अतिवृष्टी होऊन महापूर आला. यात केडीएमटीच्या ७०-८० बसेस पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाल्या. परिणामी, उपक्रमाचे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून जी घरघर लागली, ती आजतागायत कायम आहे. केडीएमसीने केडीएमटीला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु केडीएमसीचीच आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने केडीएमटी तोट्यातून बाहेर निघण्याची चिन्हे नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेता सर्वंकष अभ्यास करून खाजगीकरणाचा विचार करावा, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. तर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीएमटीचे माजी सभापती राजेश कदम यांनीही सद्य:स्थिती पाहता परिवहनचे खाजगीकरण होणे आवश्यकच असल्याचे मत मांडले....तरच खाजगीकरणाला सहकार्य राहीलखाजगीकरणाच्या मुद्यावर कर्मचाºयांना महापालिकासेवेत सामावून घेण्याची जोपर्यंत हमी मिळत नाही, तोपर्यंत आमचा खाजगीकरणाला विरोध राहील, असे मत महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे कृष्णा टकले यांनी ‘लोकमत’कडे मांडले. आमचा प्रशासनावर आणि कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास नाही. दोन दिवसांत संघटनेची अंतर्गत बैठक लावण्यात आली असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही टकले म्हणाले. खाजगीकरणाचा निर्णय अन्य कोणत्याही महापालिकेत झालेला नाही. राज्यसरकाने २०१६ साली काढलेल्या अध्यादेशानुसार जर सेवा तोट्यात चालली असेल, तर त्या सेवेला महापालिकेने सहकार्य करावे, असा नियम आहे.मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या मागील अर्थसंकल्पात २७ कोटींची तरतूद केली असताना केवळ १५ कोटीच देण्यात आले. पण, उर्वरित तरतूद रद्द केल्याने कर्मचाºयांचे वेतन देणे अशक्य झाले. खाजगीकरणाचा विचार करायचा असेल, तर आधी कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घ्या. यासंदर्भात जोपर्यंत ठराव होत नाही आणि कृती होत नाही, तोवर खाजगीकरण होऊ देणार नाही, असा पवित्रा परिवहन कर्मचारी कामगार या मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी घेतला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका