शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीला महापालिकेचे ‘इंधन’

By admin | Updated: February 16, 2017 02:04 IST

नव्याने काही न देता केवळ आगारांच्या विकासाला प्राधान्य देत मागील वर्षीच्या योजना पुन्हा मांडल्या गेल्याने ‘मागील पानावरून

कल्याण : नव्याने काही न देता केवळ आगारांच्या विकासाला प्राधान्य देत मागील वर्षीच्या योजना पुन्हा मांडल्या गेल्याने ‘मागील पानावरून पुढचा प्रवास’ असा काहीसा रोख २०१७-१८ च्या बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या सादर झालेल्या अंदाजपत्रकात दिसून आला. त्यातच, नव्याने बस दाखल होऊनही स्वबळावर अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष सुरू असल्याची भाषा करणाऱ्या उपक्रमाने केडीएमसीकडे अर्थसाहाय्य करण्याची अपेक्षा केल्याने त्यांचा पुढचा प्रवास महापालिकेच्याच मेहरबानीवर होणार असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. २०१७-१८ चे १७७ कोटी ८८ लाख रुपये जमा आणि १७७ कोटी ७३ लाख रुपये खर्चाचे, असे १५ लाख ५१ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याकडून परिवहन समिती सभापती भाऊसाहेब चौधरी यांना सादर करण्यात आले. केडीएमटीच्या ताफ्यात पूर्वीच्या १०० बस आहेत. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत १८५ मंजूर बसपैकी आतापर्यंत ७१ बस दाखल झाल्या आहेत. उर्वरित ११४ बस नजीकच्या कालावधीत दाखल होतील, असा केडीएमटी प्रशासनाचा दावा आहे. सध्या केडीएमटीला एक कोटी ८० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. केडीएमटीचा उपक्रम चालवण्यासाठी १ हजार ३७७ कर्मचाऱ्यांची गरज आहे. यातील ५७५ पदांना सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, ४९९ उपक्रमाचे, तर ७२ कंत्राटी, असे ५७१ कर्मचारी सेवेत आहेत. जुन्या १०० आणि नव्या १० वातानुकूलित बससाठी अपुरे पडणारे मनुष्यबळ पाहता ४५० वाहक आणि १०० चालक भरती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या ४२ मार्गांवर बस धावत आहेत. नवीन ५६ मार्गांवर बससेवा सुरू करण्याची उपक्रमाची मागील अंदाजपत्रकातील घोषणा यंदाही करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील पूर्व-पश्चिम भागांसह खासकरून ग्रामीण भागात बसची मुबलकता वाढवून प्रवासीसेवा देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. उत्पन्नाच्या प्रमुख बाबींचा विचार करता आधीच्या ११० बस आणि जेएनएनयूआरएम योजनेतील उर्वरित १७५ बस चालवल्यास ७२ कोटी १० लाख २५ हजार रुपये उत्पन्न मिळेल, असा अंदाज मांडण्यात आला होता. परंतु, आतापर्यंत केवळ ७१ बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. निधीअभावी उर्वरित बस दाखल झालेल्या नसल्याने अंदाजित उत्पन्नालाही खोडा बसल्याची वस्तुस्थिती आहे. वयोमान पूर्ण झालेल्या ४२ बस व अन्य ३ वाहने भंगारात काढणे, यातून ५० लाख, बसमधून प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा खर्च म्हणून मिळणाऱ्या अनुदानापोटी २ कोटी ६६ लाख रुपये थकीत आहेत. यंदाच्या वर्षात ५८ लाख ३२ हजार इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. त्याचबरोबर सण-लग्न समारंभ, यासाठी बसचे आरक्षण, यातून ५० लाखांचे तर आमदार, खासदार निधीतून ५० लाख रुपये तसेच बस वथांबे निवारे, यावरील जाहिरातींतून एक कोटी ९१ लाख ११ हजार रुपये मिळतील, अशा उत्पन्नाच्या स्रोतांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात केडीएमसीकडे उपक्रमाने महसुली खर्चासाठी ६७ कोटी ४९ लाख, तर भांडवली खर्चासाठी १९ कोटी २६ लाखांची मागणी केली आहे. मात्र, मागणीनुसार निधीची पूर्तता पालिकेकडून कधीही होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.खर्चाचा विचार करता कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनदुरुस्ती आणि निगा, इंधनखरेदी या मुख्य बाबींसह बसखरेदी, बसटर्मिनलचा विकास, कार्यशाळेचे अत्याधुनिकीकरण यावर होणाऱ्या खर्चाचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. आजही परिवहनचा उपक्रम पालिकेच्या अर्थसाहाय्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या बाबींची पूर्तता करताना उपक्रमाची तारेवरची होणारी कसरत ही नित्याचीच बाब झाली आहे. याचबरोबर गणेशघाट आगारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी, संगणक कार्यप्रणाली, आगार आदी मुद्यांसह एकमेव नव्या सोलर बसस्टॉप उभारणीच्या यामागे केलेल्या संकल्पाचाही पुन्हा समावेश झाल्याने उपक्रमाने ‘शिळ्या कढीला ऊत’ आणल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)